पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. तो सुवर्ण जयंती वर्षीच प्रकाशित होत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

 ‘बुद्धाची शांती-भीमाची क्रांती' मधील कविता वाचत असताना लक्षात येते की कवी विजय शिंदे हे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आराध्य मानतात. त्यांच्याबद्दल आदर या संग्रहातील कवितांत जागोजागी प्रतिबिंबित होणे स्वाभाविक आहे. धर्म परिवर्तनानंतरच्या गेल्या पन्नास वर्षांत दलित वर्गात काय परिवर्तन झाले याचे चित्रण संग्रहातील कवितात आहे. कवी विजय शिंदे यांना समकालीन घटनांचे चांगले भान आहे. त्यामुळे त्यांच्या कवितात साध्य होणाच्या आरक्षणाविरोधाचे जसे पडसाद आहेत, तसेच जागतिकीकरणाचेही या अंगाने कवीस समाजभान असल्याचे स्पष्ट होते.

 कवी विजय शिंदे यांनी यापूर्वी लिहिलेले ‘जयभीम गीतामाला', ‘जयभीम गीतधारा (९ भाग)', 'क्रांतिसूर्य (पोवाडा)', 'घटनेचे मारेकरी (काव्यसंग्रह)' मी वाचले आहेत. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांवर ‘शाहू राजे' हे खंडकाव्यही रचलं आहे. ते तर माझ्या हस्तेच प्रकाशित झाले याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. अशा कसलेल्या कवीच्या या कविता आहेत. आजवर पांढ-यावर काळे करणारा व डफावर थाप मारणारा हा कवी व शाहीर चित्रपट गीतकार, लावणीकार म्हणून मराठी श्रोत्यांपुढे येणार आहे. त्यांची सिनेगीतं नि लावण्या गाजल्या नाही तरच आश्चर्य!

 भीमाने दिलेल्या बळानं दलित लेकी-बाळात आलेल्या बळाचे वर्णन यातील नातं भीमाचं' कवितेत आहे. त्यांच्या काळजाच्या काठात असलेल्या डॉ. आंबेडकरांनी फुलवलेल्या निळ्या मळ्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. दलित वर्ग सुशिक्षित झाल्यानं माणसात आला. त्यामुळे आकाशही। वाकुल्या घेऊ लागलं याचा त्यांना इतका आनंद आहे की ‘पाव्हणं जयभीम बोला' म्हणत हा कवी डॉ. आंबेडकरांना रोज स्मरावं हे सुचवतो. या कवीच्या मनात दलितांचं दुःख शोधणारी आस्था आहे. म्हणून ती 'डोळे उघडे ठेवून जग पाहते. त्याचे वर्णन ते ‘उघडा ठेवून डोळा' कवितेत येणारे समकालीन समस्यांचे संदर्भ कवीस समाज मन पारखी सिद्ध करतात.

 युद्ध कशाला? हवी जगाला बुद्धाची शांती।
 मानवतेला शोभतीया भीमाची क्रांती।।
 असा उद्घोष करणारी ही कविता.संग्रहातील अन्य रचनांमधून
 स्वातंत्र्य मिळूनी देशाला झाली वर्षे साठ बाई।
 आमच्या आयुष्यात स्वातंत्र्याचा दिस उगवला नाई।।

प्रशस्ती/४७