पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बुद्धाची शांती, भीमाची क्रांती (काव्य)

विजय शिंदे

प्रज्ञा प्रकाशन, कोल्हापूर

प्रकाशन - जानेवारी, २00७

पृष्ठे - २१ किंमत - २0/-



हृदय परिवर्तनाशिवाय धर्म परिवर्तन व्यर्थ


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील भारतीय समाज परिवर्तन चळवळीचे प्रमुख पुढारी होते. त्यांनी दलित वर्गामध्ये जागृती केली. त्यांना हक्कांची जाणीव करून दिली. डॉ. आंबेडकरांच्या मते, हिंदू धर्म हा वर्ग-व्यवस्थेचा समर्थक होता. त्या धर्मात व्यक्तीस महत्त्व आहे. विषम वर्ग व्यवस्थेवर तो आधारलेला आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे हे हिंदू धर्म सांगत नाही. गुण आणि कर्म यांची तो विभागणी करतो. तो विषमतेवर आधारलेला आहे. एकास सज्ञानी करून दुसन्यास अज्ञानी ठेवत गुलाम बनवून ठेवणाच्या धर्माच्या ते विरोधी होते. एक वर्ग सशस्त्र करून ते दुसन्यास नि:शस्त्र करणारा धर्म हा अधर्म होय अशी त्यांची धारणा होती. ते धर्मापेक्षा धम्म मानत. धर्माचा आधार ईश्वर असतो तर धम्म मानवनिर्मित व समानता मानणारा असतो. म्हणून त्यांनी सन १९३५ ला धर्म परिवर्तनाची घोषणा केली पण प्रत्यक्षात त्यांनी १९५६ ला धर्म परिवर्तन केले. सतत २१ वर्षे प्रदीर्घ विचार करून मग डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धांसारखा हा एक समाज बोधच होता. चालू वर्ष (२००६) हे या धर्म परिवर्तनाचे सुवर्ण जयंती वर्ष त्याचे औचित्य साधून कवी विजय शिंदे यांनी आपल्या २१ कवितांचा एक संग्रह ‘बुद्धाची शांती- भीमाची क्रांती' या नावाने रचला

प्रशस्ती/४६