पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘लग्नाचा वाढदिवस' कथा संसाराच्या रहाटगाडग्याचं मार्मिक चित्र रंगवते. जीवनाचा उत्तररंग म्हणजे राहून गेलेल्या गोष्टीच्या परिपूर्तीचा दुसरा वसंतच. ‘आघात' मध्ये माधवी व संदीप या प्रेमी युगुलाची दर्दभरी दास्तान भेटते. फसगतीचे प्रायश्चित्त नेहमीच स्त्रीलाच घ्यावं लागतं हे। समजावणारी कथा स्त्री वेदना नि आघातांची रामकहाणी होय. 'देवदासी' ही समस्याकेंद्रित कथा. बोधप्रद व उद्देशप्रधान रूप ल्यालेल्या या कथेतील नायक देवदासीशी लग्न करून नवा मार्ग रूढ करू पाहतो तेव्हा ही कथा आदर्शवादी असल्याचं स्पष्ट होतं. हेतुपूर्वक लेखन झालेल्या या कथेत प्रेरक तत्त्वं भरलेली आढळतात. 'हरवलेलं मंगळसूत्र' वा अन्य कथा याच अंगानं जाणाच्या रूढ कथा होत.

{{gap}]‘वळणावरची वाट' कथासंग्रह विषयांची वळणं घेत कलेच्या अंगांनी म्हणाल तर सरधोपट मार्गाने लिहिलेला आढळतो. शिवाजी पाटील नवोदित कथाकार आहेत. उत्साहाच्या पहिल्या भरात बहरलेल्या या कथात कलात्मकता यायची तर लेखकांनी भरपूर वाचायला हवं. कथा हा साहित्य प्रकार रियाज म्हणून हाताळायला सोपा असला, तरी कलात्मकता रुजायला अत्यंत अवघड. याचं भान हा कथासंग्रह त्यांना भविष्यात देईल.

{{gap}]मी त्यांच्या धडपडीस शुभेच्छा देतो! त्यांच्या हातून भविष्यकाळात अधिक सरस कथांची अपेक्षा करतो.

▄ ▄


दि. ५ जुलै, २00३.

प्रशस्ती/२७