पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

प्रयत्नशील राहतात. ‘शुभ ऊर्जा' - लेखन त्या विधायक धडपडीचं एक साधन बनवून त्या योगे ते नवा माणूस घडवू पाहात आहेत.
 ‘चिरंतन शुभचिंतनातून सुंदर परिवर्तन' हे त्यांच्या या लेखनाचं ब्रीद आहे. भरत वाक्य आहे. सूचन माणसाचं वर्तन बदलते यावर लेखकाचा विश्वास असल्याने ते स्वयंसूचनातून स्वयंविकासाकडे नेऊन आपल्या विद्याथ्र्यांचा नि समाजाचा कायाकल्प करू इच्छितात. सोनेरी पहाटेची त्यांनी प्रतीक्षा आहे. म्हणून ते मयूरपंखी रंगीबेरंगी स्वप्ने उराशी बाळगतात. या पुस्तकाच्या भूमिकेतून ते स्पष्ट होते. सूचन अमलात कसे आणावे याचे धडे त्यांनी स्वानुभवातून दिले असल्याने ते डोळे झाकून गिरवायला हरकत नाही. हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांइतकंच सर्वसामान्य जनतेस उपयुक्त । व्हावे असा लेखकाचा प्रयत्न दिसतो. सर्व वयोगटातील सर्वांना ते उपयोगी व्हावे यात व्यापकता नि उदारता आहे. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक सर्वांना उपयुक्त होतील असे यातील सूचन त्याचेच निदर्शक होय.


 हे पुस्तक रोजच्या जगण्यातले ताण-तणाव, नैराश्य, आरोग्याचे प्रश्न, सामाजिक समस्या, धर्म समजुती सर्वांवर मात करण्याच्या उद्देशाने लिहिलेले दिसून येते. देशविदेशाचं भान त्यामागे आहे. एवढ्या लहान वयात अशी व्यापक धारणा केवळ ध्येयातूनच शक्य आहे. ज्याला सर्वसाधारणपणे ‘अध्यात्म' म्हणून समजले जाते अशा भाबड्या भावबोधाचे हे लेखन असले तरी माझ्या दृष्टीने त्यामागची निरागसता महत्त्वाची. 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे, हा बोध आहे खरा' हे जितके सत्य तितकेच ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' म्हणत केलेले हे लेखन अध्यात्मापलीकडची ध्येयवादी धडपड म्हणून महत्त्वाची! शुभेच्छांसह सदिच्छा!

◼◼



दि. २१ सप्टेंबर, २०१७
जागतिक अहिंसा दिन


प्रशस्ती/२७३