पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

स्वतःत मस्त असते. मनपाखरू भिरभिरत असतं. मनात पिंगा आणि जगात दंगा असलेलं हे पाखरू त्याला नात्यांचा वीट आला तरी ते झाडाच्या फांदीसारखं अटळ कुटुंब वृक्षाला बांधील असतं. 'एक पाखरं' कविता वाचली की हे सारं उमगत राहतं. मग कवयित्री मन रिझवण्यासाठी निसर्गात रमते. कधी पाऊस भेटतो; कधी समुद्र. तरी ‘दुःख' कवितेतला पूर काही ओसरत नाही. ‘विश्वास असावा' वाटत असताना सभोवतालचा अविश्वास अस्तित्व हरवणारा असतो. नात्यांची रीत आणि वीण कळता कळत नाही, सुटता सुटत नाही. मग कधी 'तुलसी' केबलसारखी वात्रटिका उसनं हसू आणते अन् त्याच वेळी दुसन्या डोळ्यात आसवं ओघळायला लागतात. जीवन हे असं विचित्र, जीवघेणं असतं खरं! वाचन त्यावरचा उतारा वाटतो. माणूस मग ‘मृत्युंजय', 'ययाती', ‘राधेय' हाती घेतो अन् जीवनाचे सारथ्य करत राहतो विरंगुळा म्हणून.
 कालभान ही कविता आणि कवीची पूर्वअट असते. अस्मिता चव्हाण यांची ‘इंटरनेट' कविता वाचली की याची साक्ष पटते. या कवितेत त्या माणसाच्या तिसच्या डोळ्याचं वर्णन करतात. याचमुळे ज्ञानाची अनंत गुहा खुल जा सिम सिम सारखी सताड उघडून महाजाल, महामाया, महाद्वार झाली.
 आई, दाजी, मित्र, पती असा फेर धरत अस्मिता चव्हाणांची कविता स्वतःला उसवत, शोधत राहते. चांदण्यात भटकते आणि स्वतःच्या अथांग मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते. मनाच्या आतल्या आत लागलेल्या । आगीची धग विझवणारा अग्निशामक माणसास अजून गवसला नसल्यानं राग, लोभाच्या द्वंद्वात ही कवयित्री कविता लिहून आपलं उन्नयन, उदात्तीकरण करू पाहते. पण ते इतकं सोपं थोडंच असतं? स्वार्थाच्या निबीड जंगलात त्याची शिकार झालेली असते अन् तो पहाट होण्याची वाट पाहात जीवन कंठत राहतो. पण जीवन नावाची गोष्ट आटपाट नगराच्या कहाणीसारखी। साता उत्तराची असते... संपत नाही की सरत नाही! केस पिकू लागतात नि युद्ध हरल्याचे धवलध्वज फडकू लागतात... ‘कृतांत कट कामल रजध्वजा । दिसू लागली' की पैलतीर आपसूक दिसू लागतो. प्रत्येकाचं आयुष्य असंच एकमार्गी असतं, ते कवयित्रीचं पण! ‘बरं झालं असतं, मन असतं जर दगड' म्हणणाच्या गुणगुणणाच्या अस्मिता चव्हाणांच्या या तगमगीनं ही सारी कविता भारावलेली आहे.
 ‘एकटी कविता' स्त्रीचा आत्मस्वर, घुसमट म्हणून विकल नि अस्वस्थ करणारा आहे. ‘धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं' अशा द्विधावस्थेत


प्रशस्ती/२६९