पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


एकटी कविता (काव्यसंग्रह)
अस्मिता चव्हाण
२0१३

_________________________

साध्या शब्दकळेतलं बिकट जीवनरूप

 ‘एकटी कविता' हा कवयित्री अस्मिता चव्हाण यांचा कविता संग्रह. जीवनातल्या विविध प्रसंगांना सामोरे जात असताना मनात आलेले विचार त्यांनी कवितेतून व्यक्त केले आहेत. या कविता त्यांनी लिहिलेल्या नाहीत. ती त्यांची एक प्रतिक्रियात्मक निर्मिती आहे. संवेदनशील माणसं सतत अस्वस्थ असतात. ती विचार करत राहतात. त्यांचं स्वतःशीच पटत नसल्यानं त्यांचं दुस-याशी जमण्याचा सुतराम संबंध असत नाही. परिणामी ती समाजात व घरात एकटी पडत जातात. एकटेपणामागे दुःख, विफलता, वैराग्य असतं. तसंच समाजमान्य चौकटीतील घुसमटही एक कारण असते. विवाहित स्त्री-पुरुष लग्नाच्या बंधनात अबोध वयात बांधले जातात. घरगृहस्थीच्या क्रमात पुलाखालून भरपूर पाणी वाहून जातं. काळ मागे पडतो, भविष्य नव्या स्वप्नांची पहाट दाखवत असतं आणि वर्तमान असतो मात्र तगमगीचा! मग कविता वाट काढते. 'एकला चलो रे!' म्हणत माणसं मग आत्मस्वर आत्मीय संबंध शोधतात, त्यांना साद घालतात. अशा सादप्रतिसादात जन्मलेली ही एकटी कविता'.
 माणसाचं एकटेपण कधी गतकालाचं स्मरण रंजन असतं तर कधी वर्तमानाशी हितगुज तर कधी भविष्यवेधही! अबोल दिसणारा कवी सतत बोलत राहतो... स्वतःशी, दुस-याशी, निसर्गाशी, निर्जिवांशीपण! ती


प्रशस्ती/२६८