हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुष्य मी इवले झरेच मानले' अथवा 'माझे साधे जगणे मोठे' मानणारा हा कवी नम्रदास बनून आपली मर्यादाच मान्य करताना आढळतो. असं मातीत पाय रोवून आकाशाकडे डोळे लावणाच्या बळीराजाचं काळीज घेऊन आलेली ही कविता सर्वत्र शोकाकुल भावाने ओथंबलेली. पण या कवीची उद्याची कविता आनंदघन व्हायची तर जीवनाच्या उज्ज्वल पक्षाची पडताळणी तिनं करायला हवी. आत्महत्येकडे जाणाऱ्या वाटेपेक्षा आत्मभान देणारं पाथेय या कवितेस लाभेल तर प्रतिकूलतेतूनही स्वतःचा सूर्य उगवण्याचं सामर्थ्य शांतीनाथ वाघमोडे दाखवू शकतील. भविष्यकाळात ते त्यांनी दाखवावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा!
◼◼
दि.२६ मे २०२१
प्रशस्ती/२६०