पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


दुःखभोग (कविता संग्रह)
शांतीनाथ वाघमोडे

___________________________________


प्रतिकूलतेतही स्वतःचा सूर्य शोधणारी कविता

 कवी शांतीनाथ वाघमोडे नवोदित कवी होत. ते मूळचे चिकमहूदसारख्या सांगोल्याजवळील (जि. सोलापूर) खेड्यातील. नोकरीच्या निमित्ताने नाशकाला आले. दोन्ही गावं एका राज्यातली असली तरी दोन राष्ट्रांइतका सुबत्तेतील फरक. परिस्थितीतील अंतर त्यांना अस्वस्थ करतं. व्यवसायानं प्राथमिक शिक्षक असल्यानं असं का? ची जिज्ञासा त्यांना अंतर्मुख करते. या निरंतर विचारातून त्यांची कविता जन्मते. त्यामुळे तारुण्यसुलभ प्रेम, प्रणयाशिवाय ती कविता शेतकरी, शेत, जीवन, ऋतू, माणूस, उपेक्षा, भूक, धर्म अशा कितीतरी वळणांनी समग्र जीवन व्यक्त करते. माणसाचं सारं जीवन म्हणजे असतो एक ‘दुःखभोग'. हा निष्कर्ष सूचित करणारं शीर्षक ल्यालेल्या या काव्यसंग्रहात दुःख, निराशेची झालर अनिवार्यपणे येते, कारण कवी आणि त्याच्या भोवतालचं जग प्रतिकूलतेशी झगडत जगणं सुकर करत आहे.
 ‘दुःखभोग' मधील कविता फार कलात्मक नसल्या तरी आशयसंपन्न होत. कविता लेखन शांतीनाथ वाघमोडेंचा वेळ घालवायचा छंद नसून जीवनाचा तो जाणीवपूर्वक घेतलेला शोध आहे. यातील अनेक कविता नाशिकमधील सकाळ, लोकमत, गावकरीसारख्या दैनिकातून प्रसिद्ध झाल्याने वाचकांपर्यंत सुट्या-सुट्या अगोदरच पोहोचल्या आहेत. त्यातून कवी


प्रशस्ती/२५६