पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

चित्रं गुंफेत कोरली. मग तो रंगवू लागला. शेकोटीची गोष्ट होती हावभावांची. नंतर त्यानं भावाला भाषा दिली. भाषेला लिपी मिळाली तसं गोष्टीचं पुस्तक तयार झालं.
 आदित्यची ‘परीस' कथा सोनपूर राज्याची. तिथं वृषसेन राजा राज्य करायचा. त्यानं एकदा यज्ञ करायचं ठरवलं. त्या काळात अचानक एक गरुड अवतरला. त्यातून विचित्र अलौकिक घटना घडल्या. केशव वाचला. बाकी सारं राज्य नष्ट झाल. त्याला ब्रह्मांडी भेटला. त्यानं केशवला तीन मणी - सिंहमणी, नागमणी, राजमणी आणले तर परत राज्य निर्माण करता येईल असे वरदान दिलं. ते तीन मणी हेच केशवचे ‘परीस' ठरले. ते त्यानं कसे मिळवले त्याची चमत्कारपूर्ण, साहसी कथा.
  मला विचाराल तर आदित्यने ही गोष्ट जुन्याच पद्धतीने लिहिली. आपण एकविसाव्या शतकात आहोत. या युगात काय कमी चमत्कार आहेत? नोबिता पाहता ना? डोक्यावर पंखा घेऊन उडणारा माणूस? बटन दाबलं की उघडणारं दार. स्पर्श केला की छू मंतर काहीही होतं. माणूस नसलेली विमानं. परग्रहावर लोक किती नव्या नव्या कल्पना आजच्या कथेत आल्यात. अशावेळी यज्ञ म्हणजे विज्ञानात वेदाची गोष्ट सांगणं. आदित्यमध्ये प्रचंड कल्पनांचं भांडार आहे. वर्णन करण्याची छान कला आहे. तो घटना, प्रसंग सुरेश गुंफतो पण पुराणात रमतो. त्याने स्वर्ग सोडून अवकाशात भरारी घेतली पाहिजे. गरुडाऐवजी त्याच्या कथेत रॉकेट हवं. मोबाईल, व्हिडिओ गेम, इंटरनेट, कॅफे, कॅसिनो, वंडरवर्ल्ड, वॉटरपार्क, थ्रीडी थिएटर हवं. मग त्याच्या कथेला वाचक मिळतील. आई-बाबांसाठी नाही आपण लिहायचं. आपण लिहायचं लिट्ल वंडर्स, किड्स पार्क, गॅझेट्स च्या गमती. टच स्क्रीन हाच नव्या युगाचा ‘परीस' आहे, हे लक्षात । घेऊन आदित्य लिहील तर तो भारताचा ‘हॅरी पॉटर' होईल. ।
  तरीही त्याची ‘परीस' कथा काही कमी प्रतीची नाही. तिच्यात क्षणाक्षणाला दे धमाल फंडे आहेत. ते एकदा मुळातून वाचलेच पाहिजे. जुन्यातूनच नवं सोनं उगवतं ना? आदित्यचं अभिनंदन! चीऽ ऽज!! हिप हिप हुरे।।।


◼◼


दि. १३ मार्च, २०१५


प्रशस्ती/२५५