पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

इच्छित होते. समाजातील भेदाभेद, विषमता, अंधश्रद्धा, दारिद्रय, अज्ञान दूर करण्याचं स्वप्न ते आपल्या कथात्म साहित्यातून पाहात होते. उच्च, मध्य आणि निम्न वर्गात विभाजित समाज आपल्या वर्ग चेतनात गुरफटलेला असल्यामुळे स्वातंत्र, समता, बंधुता, लोकशाही आणि विज्ञाननिष्ठा या पंचशीलाच्या आधारे ते वर्ग संवेदनांपलीकडे जाऊन समानशील एकात्म समाज कसा निर्माण करतील याच चित्रण खांडेकर करू इच्छित होते. त्या सर्व समाजाच्या व्यथा, वेदना हा त्यांच्या साहित्याचा केंद्र होता. जग हे बदलायचे' असा ध्यास घेऊन निघालेला खांडेकर यांच्यासारखा लेखक एका अर्थाने नव्या मानव समाज निर्मितीचे चित्र रंगवत होता. त्यात भाबडेपणा असला तरी सच्ची तळमळ होती. जीवन आणि साहित्य खांडेकरांसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे म्हटले तर ते वावगे। ठरू नये.
 वि. स. खांडेकरांनी सुमारे ३५० लघुकथा लिहिल्या. त्यांच्या हयातीत जे ३६ कथासंग्रह प्रकाशित झाले त्यात सुमारे ३00 मौलिक कथा संकलित झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात स्वप्न आणि सत्य', 'भाऊबीज', ‘विकसन’ आणि ‘सरत्या सरी' सारखे कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यात उर्वरित ५० कथा संकलित झाल्या आहेत. त्यांसह डॉ. सविता व्हटकर यांनी कथांत चित्रित समस्यांचा अभ्यास प्रस्तुत करून आपल्या संशोधनास आधुनिक बनवलं आहे व एक प्रकारे त्यामुळे हे संशोधन मौलिकतेकडे झुकते. कथाकार म्हणून खांडेकरांना अपूर्व लोकप्रियता व मान्यता मिळाली. मराठी रूपक कथांचे सर्जक व विकासक म्हणून खांडेकरांकडे पाहायला हवं. या सर्व कथांतून खांडेकरांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक समस्यांचे चित्रण केले. खांडेकरांच्या राजकीय कथा फारशा नसल्या तरी त्यांच्या कथांचे विषय, पाश्र्वभूमी काही ठिकाणी राजकीय आढळते. मराठी कथेत मध्यमवर्गीय जाणिवा व समस्यांची जितकी चर्चा, चिकित्सा खांडेकरांनी केली तितकी ती अन्य समकालीनांमध्ये आढळत नाही. यावरूनही खांडेकरांच्या कथाकार म्हणून असलेल्या समस्याकेंद्री विवरण आणि विश्लेषणाचा विचार करून डॉ. व्हटकर यांनी खांडेकरांच्या समाजशील कथाकारास योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
 तीच गोष्ट कादंब-यांची पण. नवी स्त्री' सारखी कादंबरी असो वा ‘सोनेरी स्वप्न भंगलेली असो, अपूर्ण वा अप्रकाशित राहिलेल्या कादंब-यांसह डॉ. सविता व्हटकर समस्यांचा पट मांडतात तेव्हा त्यांच्या या संशोधनपर लेखनास समग्रता लाभते. कथेप्रमाणेच खांडेकरांनी मराठी कादंबरीस नवा


प्रशस्ती/२४८