पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

की प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी वा शत्रूपक्षावर हल्ला करण्यासाठी जेव्हा बाण नि तोफाही निष्प्रभ वाटू लागतात, तेव्हा शहाणा माणूस वृत्तपत्र काढतो. त्यासाठी उर्दूमध्ये एक मशहूर शेर आहे.


‘खींचो न तीर को, न कमान को
तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो।।'


 प्रभाकर आरडे यांनी आरडंट व्ह्यू' हे अशा प्रभावी आविष्कार नि अभिव्यक्तीचे माध्यम बनवून समाज परिवर्तनाचा वारसा चालवला. वृत्तपत्रे अपवादाने दीर्घकाळ चालतात. शहाणी माणसे जे चिरंजीवी समाजकार्य करतात त्याचे समाज स्मरणही अल्पकालिक असते. इंग्रजीत प्रचलित असलेल्या वाक्यात बदल करून मी म्हणेन, 'Though society has short memory, but always has a sensitive and strong remembarance.' माझे स्नेही व सन्मित्र प्रभाकर आरडे यांनी प्राथमिक शिक्षण व शिक्षक हित

आपले जीवित कार्य मानले. घेतला वसा टाकू नये.' या न्यायाने त्यांनी ते व्रत आणि विरासत (पारंपरिक वारसा) म्हणून जपले, याचा मला जो आनंद व अभिमान आहे, तो या अग्रलेख वाचनाने सार्थ ठरविला. प्रकृती साथ देत नसतानाही ते करत असलेल्या धडपडीचा मी निकटचा साक्षीदार आहे. समाजात असा एक जागल्या (Whistle blower) असला तरी तो सत्ताधा-यांची झोप मोडत सामान्यांचं जिणं व झोप सुखाची करतो. त्यांना शुभेच्छा! लेखनास प्रोत्साहन, शाबासकी।

◼◼


दि. ११ जून, २०१७ साने गुरुजी स्मृतिदिन.


प्रशस्ती/२३८