पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असून कवीला काय म्हणायचं आहे, ते वाचकाच्या लक्षात आलं की पुरे. खेड्यात जन्मलेला, जगलेला कवी, त्याची रोजची बोली हाच त्याच्या आशयाचा अंगरखा असतो. ढगळा सदरा नि आखूड विजारीतले कवी महंमद बाळबोध असूनही त्यांचे निष्पापपण, भाबडेपण सहवासातल्या माणसांना भावतं तशी त्यांची कविता जशी आहे, तशी जनतेला भावते. म्हणून त्यांच्या लेखी महंमद शाहीरच. त्यांच्या कवितेला कोणतंही डफ, तुणतुणं, टाळ, मृदंग लागत नाही. ती जन्मतःच ताल, नाद, ठेका घेऊन जन्मते, म्हणून महंमद कवितेचे ठेकेदार ठरतात.

  ‘पैंजण' काव्यसंग्रहात कवी महंमद नाईकवाडे यांनी रचलेल्या ३५ कविता आहेत. त्या रचल्या म्हणण्यापेक्षा जन्मल्या म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे. कारण हा कवी नित्य कवितेच्या चाळ्यातच गुंतलेला मी अनुभवलेला आहे. 'कळस' कविता देवाचा केलेला धावा होय. 'मला वाटते...' मध्ये ही भक्ताची आळवणी आहे. आपले कष्ट फळाला यावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा या रचनेत प्रतिबिंबित आहे. 'वाट' माणसास सनदशीर, नैतिक जीवन जगण्याची शिकवण देते. 'तिखट' कविता जीवनाचं जळजळीत सत्य व्यक्त करते -

माझ्याच घरात
माझ्या बायकोला
कविता थोडी तिखट आहे


  म्हणणारा हा कवी, त्याच्या बायकोला कविता सवत वाटणे स्वाभाविक आहे. 'ऐसा राजा' छत्रपती शिवरायांच्या प्रती आदरभाव व्यक्त करत वंदन गीत सिद्ध होते.
 कवी महंमद नाईकवाडे शाहीर, कवी जसे तसे लावणीकारही. त्यांची ‘लावणी' लोकनाट्याला, वगाला शोभा आणणारी खरी. लावणीचं खरं सौंदर्य तिच्या द्वयर्थी असण्यात आहे. लावणीतला ‘आवळा' शब्द या संदर्भात पाहण्यासारखा आहे. शृंगार हा माणसाचा ज्वर की रस ते अद्याप ठरलेलं नसलं तरी हे रसायन पूर्वापार काव्याचे अभिन्न तत्त्व बनून पिढ्यान्कवीचं करुणाष्ट्रकच होय. ‘कष्टफुले फुलणार कधी' या ओळींचं नि कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांच्या ‘अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना'चं अभिन्न असं नातं हे की शतक उलटून गेलं तरी सामान्यांचं जगणं, झिजणं, सोसणं सरलेलं नाही, बदललेलं नाही. स्वातंत्र्य कुणा स्वातंत्र्य' या प्रश्नाचं उत्तर गेल्या ७० वर्षाच्या प्रवासातील विकासाने आपण देऊ शकलेलो नाही.

प्रशस्ती/२१४