पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________
पैंजण (काव्यसंग्रह)
महंमद नाईकवाडे
कविवर्य एकनाथ पांडूरंग रेंदाळकर वाचनालय, रेंदाळ, जि. कोल्हापूर
प्रकाशन - ऑक्टोबर, २०१७
पृष्ठे - ५0 किंमत - ५0/

___________________________________

साध्या, भोळ्या जगण्याचे करुणाष्टक
 कवी महंमद नाईकवाडे यांचा ‘पैंजण' हा नवा काव्यसंग्रह वाचला. त्याच्या यापूर्वीच्या एका काव्यसंग्रह प्रकाशनास मी पाहुणा म्हणून उपस्थित राहिल्याचे आठवते. त्यांचं गाव रेंदाळ, जि. कोल्हापूर. या गावचे एक कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर हे मराठीतील ख्यातकीर्त कवी म्हणून सर्वत्र परिचित आहे. अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना' म्हणत त्यांनी आपल्या बिकट परिस्थितीचे केलेले वर्णन वाचताना प्रत्येक गरीब वाचकास आपले वाटत आले आहे. या रेंदाळ गावच्या मातीत नि तिथल्या पाण्यात कवी जन्माला घालण्याचा गुण लक्षात येतो. सद्यः काळातही डॉ. रफिक सूरज, जयसिंग पाटील यांच्यासारखे कवी मला दिसतात. कवी महंमद नाईकवाडे याच पंक्तीतील कवी होत. ते कवी तर आहेतच पण रेंदाळ गावचे सर्व लोक त्यांना शाहीर महंमद नाईकवाडे म्हणून ओळखतात. मी त्यांची कवने, पोवाडे, लावण्या ऐकल्या आहेत. त्यांचे सर्व काव्य सामान्यांच्या जगण्याचे वर्णन आहे. ‘जातीच्या सुंदरा सर्व काही शोभते' या न्यायाने उपजत कवी मन घेऊन आलेले कवी महंमद नाईकवाडेंना कवन रचनेसाठी शब्दांची जुळणी वा जोडणी करावी लागत नाही. बोली भाषेतलं अवघड सौंदर्य त्यांच्या शब्दकळेस आहे. कवितेला व्याकरण, प्रमाणभाषा इ. मोजपट्या लावणे चुकीचे असते. कवितेचं खरं सामर्थ्य कवीची भावकळा


प्प्रशस्ती/२१३