पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंचायतीच्या कामगारांची संघटना बांधून त्यांना न्याय मिळवून दिला. मोहन धारिया तेव्हा वकिली करत. त्यांनी कामगार संघटनेचे वकीलपत्र घेऊन न्याय मिळवून दिला. हा काळ साधारण १९५८ चा असेल.

 वकिलीपेक्षा शिक्षकाचा पेशा हा ध्येयाद्वारे समाज परिवर्तनाचा रास्त मार्ग वाटून त्यांनी आपल्या जन्मगावी परत येऊन स्थिर व्हायचं निश्चित केलं. त्या वेळी लोकल बोर्डाचे पुढारी व्ही. टी. पाटील यांचे एक हायस्कूल उत्तूरमध्ये सक्रिय होते. दोनच इयत्ता असल्याने ते नीट चालत । नसे. तिचा कारभार त्या वेळी एम. आर. देसाई, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रभृती पहात. ती शाळा अनंतराव आजगावकरांसारख्या ध्येयवादी तरुणाने चालवावी याबद्दल सर्वांचा दुजोरा होताच. शिवाय जे. पी. नाईक यांची पाठराखणही होती.

 सन १९६० मध्ये अनंतराव आजगावकर यांनी विधिवत आंतरभारती शिक्षण मंडळाची स्थापना करून उत्तूर विद्यालय, उत्तूर आपल्या व्यवस्थापनाखाली सुरू केले. आंतरभारती विचाराची कोल्हापूर जिल्ह्यातील गुढी उभारण्याचं ऐतिहासिक श्रेय जातं ते या शिक्षण तपस्वीस. या चरित्रातून ते सारं पानागणिक उलगडत जातं. हे चरित्र आपणास सांगतं की आजगावकर सरांनी भारताच्या नकाशावर नसलेल्या छोट्या छोट्या गावात शाळा सुरू करून त्या गावांना महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आणलं. उत्तूर, चिमणे, पिंपळगाव बारवे अशा अपवाद चारच ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या.

 शिक्षण तपस्वी आजगावकर यांनी या शिक्षण प्रसाराच्या माध्यमातून जबाबदार, ध्येयवादी, प्रामाणिक, शिस्तीची चाड असलेले नागरिक घडविण्याचे अनंत प्रयोग केले. टोपी हे ग्रामीण भारताचं प्रतीक. शिवाय गांधी टोपी म्हणून तिचं ध्येय मूल्य अबाधित. प्रारंभी मुले, मुली व शिक्षकांचे गणवेश पोषाख खादीचेच असत. मुले-मुले अधिकांश काळ शाळेत घालवत. शिक्षक निवासीच असल्यासारखी स्थिती. बारा महिने चोवीस तास ते विद्याथ्र्यांना उपलब्ध असत. यातून संस्कार घडे. कॉपी न करणारे विद्यार्थी वर्षानुवर्षे घडवणे इतके छोटे काम गृहीत धरले तरी । कालौघात ते किती मोठे, हे कोणीही मान्य करेल. अनंतराव आजगावकरांनी शिक्षण, समाज, अर्थकारण, राजकारण, समाजसेवा, ध्येयवाद असा परीघ वाढवत नेऊन आपल्या कार्याचा परीघ रुंदावला. पण मूल्यांची त्यांनी कधी न प्रतारणा होऊ दिली, न समझोता केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवून जिंकली. भ्रष्टाचार मुक्त कार्य करता येते हे

प्रशस्ती/२०५