पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उलटून गेली तरी त्यात कणसुर घट नाही चढसुर वाढ. एकसुर अढळ आदरापोटी त्यांनी आपल्याला गुरू तल्य वाटणाच्या अनंतराव आजगावकरांविषयी श्रद्धा व्यक्त करायची म्हणून ‘तपस्वी' शीर्षक सुमारे १00 पानांचं छोटेखानी चरित्र लिहिलंय.

 अनंतराव आजगावकर यांचा जन्म ९ सप्टेंबर, १९३0 ला, उत्तूरला बालपण भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे गेले. पिंपळगाव हे उत्तूरच्या पायथ्याला चिकोत्रा नदीच्या काठी वसलेलं शंभर उंब-यांचं पण गाव नसेल. टेकडीवर वसलेलं टुमदार गाव. इथे ठाकुर कुटुंबीय गावचे वतनदार, जमीनदार. त्यांची कन्या विठाबाई अवघ्या पंधराव्या वर्षी उत्तूरच्या विष्णू नरहरी आजगावकरांना दिली. घरची गरिबी म्हणून मुलं आजोळीच वाढली. त्यांना दोन अपत्ये झाली. एक अनंत तर दुसरी इंद्. अनंता पिंपळगावलाच इयत्ता तिसरीपर्यंत शिकला. त्याचे वडील लहानपणीच वारल्याने पोरकं जीवन बालपणी जगावं लागलं. मामांनी मुलांच्या सांभाळात काही कसर नाही ठेवली. त्या वेळी चौथी इयत्तेत शिष्यवृत्ती व केंद्र परीक्षा असायची. पिंपळगावला सोय नसल्याने त्यांना बाळकृष्ण शहापूरकरांच्या खासगी शाळेत घालण्यात आलं. नूल, गडहिंग्लजमध्ये ते शिकत राहिले. त्यांचं माध्यमिक शिक्षण एम. आर. हायस्कूल, गडहिंग्लजमधून झालं. इथे सिंबॉयसिसचे शं. ब. मुजुमदार त्यांचे सहाध्यायी होते. मॅट्रिक पूर्ण करून ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी चुलत आजोबांकडे कोल्हापूरला गेले. त्यांचे आजोबा कोल्हापूर संस्थानात सुपरिटेंडेंट होते. घरी नोकर, चाकर, जमीन, जुमला सर्व होतं. हा काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. राजाराम कॉलेजमध्ये बी. ए. करत असताना विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. राष्ट्रसेवा दल ही संघटना साने गुरुजी प्रभावित होती. समाजवादी विरुद्ध राष्ट्रीय काँग्रेस अशा विद्यार्थी संघटनेच्या संघर्षात अनंतराव आजगावकरांनी समाजवादी छावणीत दाखल झाले ते समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांच्या प्रभावामुळे. याच काळात त्यांनी महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या प्रभावाने खादी स्वीकारली ती कायमची.

 सन १९५५-५६ च्या दरम्यान पदवीधर होऊन वकिली करायची डोक्यात असताना ते गडहिंग्लजमध्ये परतले. काहीतरी देशासाठी भव्य, दिव्य करायचं असं स्वप्न व ध्येय घेऊनच. प्रारंभी गडहिंग्लज येथे त्यांनी गणित, इंग्रजीच्या शिकवण्या सुरू केल्या व स्वावलंबी झाले. पर्यायच नव्हता. याच काळात गडहिंग्लजच्या समाजवादी कार्यकर्त्यांच्या वर्तुळात ते सक्रिय झाले. परिवर्तनाचे व न्याय, समतेचे कार्य करायचे म्हणून नगर

प्रशस्ती/२०४