पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवन जगणं ही कल्पना नसून ते एक भीषण वास्तव आहे. झळ त्या विद्रूप, क्रूर वास्तवाचं प्रतीक होय. झळीचा प्रदेश पादाक्रांत कराल तर तुम्हास चांदण्या रात्रीचं सौंदर्य प्रसन्नता देत राहील. युवराज पाटील यांच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे कल्पना आणि वास्तवाचा सुंदर मिलाफ होय. युवराज पाटील यांना माणसाचं जीवन सत्य, शिव, सुंदर असावं वाटतं. पण असं वाटण्यातल्या भाबडेपणाला फाटा देत ते लिहितात. त्यांना हे माहीत आहे की डोंगर चढल्यानंतरच दरीचं सौंदर्य दृष्टिपथात येतं.

 चंद्रप्रकाशाच्या झळा' लेखसंग्रहात युवराज पाटील लिखित अठरा लेख आहेत. अठरा विश्व दारिद्रय पाहिलेला हा लेखक संवेदनशील आहे. ‘स्वदुःखाच्या पलीकडे जाऊन, ‘आप’ला ओलांडून तो 'पर'चा विचार करणारा समाज शिक्षक आहे. ‘जीवन त्यांना कळले हो' अशी काही माणसं असतात. ती माणसं स्वतःला ओलांडून (खरं तर स्वतःला विसरून) जगाचाच घोषा लावत बसतात. मग एकाच वेळी त्याला जगण्याच्या भिन्न कळा जाणवू लागतात. त्याला कवितेतलं शब्द सौंदर्य खुणावतं नि शेतक-याचे कष्ट, घाम, दारिद्रयही त्याला तितक्याच तन्मयतेनं साद घालत राहतं. मग त्यातून शेतकरी, पाऊस आणि कविता' सारखा ललित लेख जन्मतो. पाऊस शेतक-यासाठी वरदान असतो. जर तो पिकाच्या । गरजेनुसार पडला तर. पण तो असतो लहरी. तो त्याच्या मातीचाच नाही तर आयुष्याचा चिखल करून टाकतो. हे दिसायला, कळायला कवी मन । असावं लागतं. अश्रूतलं इंद्रधनुष्य ज्याला दिसतं तो प्रतिभावान साहित्यिक. युवराज पाटील कवी, शिक्षक, समाजसेवक असं व्यक्तिमत्त्व घेऊन जगत असल्याने ते केवळ कल्पनेत रममाण नाही होत. वास्तवाची झळ त्यांना लागलेली असल्याने व तीही कळत्या वयात लागली असल्याने ज्वालांच्या फुलं बनवण्याचं स्वप्न घेऊन ते लिहीत राहतात. त्यांच्या लेखनामागे जीवन मांगल्याची शिव नि सुंदर ओढ आहे. म्हणून ते सत्याला पालाण न घालता सामोरे जात लिहितात. पावसाचा वेध घेत लिहिलेलं काव्य पूर्ण ललित लेखन माणूसलक्ष्यी होतं. ते वाचून विसरता येत नाही. असं शल्य सुंदर हे लेखन माणसाला अंतर्मुख करतं. ते जागं ठेवतं. म्हणून त्याचं मोल मातीला मोत्याचा साज चढवणाच्या माऊलीच्या हातांना मेंदीचं वरदान नसलं, तरी डोक्यावर सूर्य घेत भांगलणीच्या हातांना पडलेले घट्टे, दगड, माती, खडकांचे टवके हेच तिचं सौंदर्य! झळेतही झळाळी दडलेली असते हे ज्यांना अनुभवायचे असेल त्यांनी या मायमाउलीचा हात आपल्या चेह-यावर मायेनं फिरवून घ्यावा. मग त्याला एकाच वेळी मायेतलं राकट

प्रशस्ती/१७४