पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निसर्गाने गरुड पंख दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनातल्या समस्या सोडविण्याकरिता केवळ बुद्धिवाद किंवा केवळ भावनात्मकता यांच्यावर भर देऊन भागत नाही, त्या दोन्हीची प्रत्येक पिढीच्या परिस्थितीच्या दृष्टीने सांगड घालावी लागते.'(प्रीतीचा शोध पृ. २१४)

 डॉ. वर्षा वाकरणकर यांनी मूल्यशिक्षण देणाच्या कथा म्हणून ज्या ५० रचनांची निवड केली आहे. त्या कथाप्रकाराच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहेत. त्यात भावकथा, नीतीकथा, कौटुंबिक कथा, रूपककथा, सामाजिक कथा, प्रेमकथा अशा वैविध्यांचा समावेश असल्याने त्या खांडेकरांच्या कथा वैशिष्ट्यांच्या दृष्टीनेही प्रातिनिधिक बनल्या आहेत. हे मात्र खरे की। खांडेकरांनी आपल्या पहिल्या कथांचे जे संग्रह प्रारंभीच्या काळात तयार केले त्यापैकी ‘नवमल्लिका' (१९२९), 'पहिली लाट' (१९४०), ‘पहिल्या वहिल्या' (१९४४) सारखे कथासंग्रह तर विद्यार्थ्यांसाठीच तयार केले होते. त्यात तरुणांच्या भावना व प्रौढांचे विचार चित्रित करणाच्या गोष्टी संग्रहातून मुद्दाम वगळण्यात आल्या होत्या.' (नवमालिका पृ. १) खांडेकरांची ही सतर्कता लेखकातील शिक्षकाची सजगता सिद्ध करते, तशीच ती । मूल्यशिक्षणाचे पथ्यही स्पष्ट करते. हाच तो मूल्यविवेक म्हणायचा. या कथा वाचक कशा वाचतील, घेतील हे खांडेकरांनी बेट्सच्याच शब्दात सांगताना म्हटलं आहे की, "The best, I can hope, is that they will read these stories with something of the spirit in which they were written; for pleasure, and out of a passionate interest in human lives." (पहिली लाट - पृ. ९) यातूनही खांडेकरांची कथालेखनाची भूमिका स्पष्ट होते. मानवी कल्याणासाठी भावुकपणे लिहिणारे खांडेकर त्यांची वृत्ती मनोरंजनार्थ कथालेखनाची कधीच नव्हती. रंजकता ही त्यांच्या कथेतून वाचकास लाभली तरी मूल्यांची मात्रा प्रत्येक कथेत वरचढच राहिली.


 ‘‘खांडेकरांच्या कथा साहित्यात मूल्यशिक्षण विचार लक्षणीय आहे. हे साहित्य मूल्य रुजवणीचे उत्तम साधन आहे. खांडेकरांच्या कथा साहित्यात तत्कालीन सामाजिक प्रश्न व स्थितीचे सम्यक दर्शन घडते. या कथांतून वि. स. खांडेकरांचे व्यक्तिमत्त्व व जीवन प्रतिबिंबित झाले आहे. या कथांनी मराठी बरोबर भाषांतराद्वारे तमिळ, गुजराथी, कन्नड साहित्यात मोलाची भर घातली आहे.' असे अनेक निष्कर्ष पुढे ठेवणारे डॉ. वर्षा वाकणकरांचे हे संशोधन ग्रंथालयीन अभ्यास, सर्वेक्षण, वैज्ञानिक विश्लेषणातून प्राप्त झालेले असल्याने त्यांचे शैक्षणिक महत्त्व आहेच. पण त्यापेक्षा त्यांची

प्रशस्ती/१५३