पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आढळली. त्यात ४५ कथांत ‘संवेदनशीलता' हे मूल्य आढळले. यातून संवेदनशीलता हे खांडेकरांच्या कथेचे केंद्रीय मूल्य आहे असा निष्कर्ष । संशोधिकेने काढला आहे. तो संशोधन मर्यादेत खरा असला तरी समग्र कथांचा विचार करता तेच केंद्रीय मूल्य मानता येणार नाही. वि. स. खांडेकर एक लेखक म्हणून संवेदनशील होते हे मात्र खरं.

 मूल्य ही गोष्ट मुळात तात्त्विक व मूलभूत असे वर्तनास मार्गदर्शक ठरणारी ही गोष्ट होय. ती योग्य व प्रमाणित ठरते ती तिच्या अपेक्षित व सकारात्मक विचार-व्यवहारामुळे. त्यामुळे शिक्षणात जेव्हा मूल्यांचा विचार होतो तेव्हा विधायक वर्तन व्यवहार हे त्याचे साध्य असते व शिक्षण साधन बनून राहते. साहित्याच्या बाबतीतही असेच आहे. साहित्य लेखन अनेक उद्दिष्टांनी होत असले तरी अंतिमतः ते मानव समाजाच्या हिताचे असले पाहिजे हे गृहीतच असते. वि. स. खांडेकरांनी साहित्य, समाज आणि मूल्य यांच्या परस्पर संबंधांच्या अनुषंगाने ‘प्रीतीचा शोध' या आपल्या कथासंग्रहाच्या ‘शोधाच्या नादात' शीर्षक प्रस्तावनेत आपली मूल्यविषयक भूमिका विस्ताराने मांडली आहे. या संग्रहात ‘वारसा' कथा आहे. या कथेत चिरंतन । जीवनमूल्यांवरल्या श्रद्धेचे सद्य:स्थितीत ती मूल्ये कशी ढासळू पहात । आहेत आणि ती ढासळू नयेत म्हणून मानवी संस्कृती कशी धडपडत आहे। या परिस्थितीचे वर्णन आहे. ते व्यवच्छेदक असले, तरी खांडेकरांच्या समग्र कथा साहित्यातून ते प्रतिबिंबित होताना दिसते. खांडेकर आपल्या कथांतून अनेक प्रश्न करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर - ‘रामकृष्णाच्या काळी उपयुक्त असलेली जीवनमूल्ये आजच्या काळातही व्यक्ती व समाज यांच्या दृष्टीने तितकीच उपकारक राहिली आहेत काय?', ‘आदर्शासाठी जीवन आहे की जीवनासाठी आदर्श आहेत?', ‘पाप-पुण्याचे नियम कुणी केले?' इत्यादी कथाकार खांडेकर साहित्यिक, चिंतक म्हणून सतत अस्वस्थ दिसतात. ते आपल्या साहित्यातून केवळ प्रश्न, समस्या मांडत नाहीत तर कालसंगत मूल्ये काय असली पाहिजेत हेही सुचवितात. त्यामुळे खांडेकर वास्तववादी चित्रण करणारे कथाकार जसे असतात तसेच उद्याच्या जगाचे ते भाष्यकारही ठरतात. म्हणून त्यांच्या कथात्मक साहित्याचे मूल्यशिक्षणाच्या संदर्भातले महत्त्व लक्षात येते. खांडेकर परंपरागत मूल्य आणि संस्कारांना वर्तमानाच्या कसोटीवर पारखण्याचा आग्रह धरतात यात त्यांचे पुरोगामित्वच सिद्ध होते. ते म्हणतात ते खरेच आहे की ‘विवेक हे बुद्धिवाद आणि भावना यांचे अपत्य आहे. बुद्धिवादाला डोळे असले तरी बहशः पाय नसतात. भावना जन्मतः आंधळी असते; पण या आंधळ्या शक्तीला

प्रशस्ती/१५२