पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आठवणीचे तरंग (आत्मकथा)
का. मा. आगवणे
सौ. कुसुम आगवणे.
प्रकाशन - जानेवारी, २०१३
पृष्ठे - १८९ किंमत - १५0/




गैराशी वैर करत लाभलेलं गौरवी जीवन


 का. मा. आगवणे हे बारामतीमधील मूळ सामाजिक पिंड असलेले राजकीय कार्यकर्ते नेते होत. मागास वर्गात जन्म, शिक्षण, जीवन गेले तरी उपजत राष्ट्रभक्ती व समाजसेवी वृत्तीमुळे ते मूल्याधिष्ठित कार्य करणाच्या प्रभावळीत राहतात नि त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं. त्यांचा जन्म शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. वडील मारुतीराव व आई अनुसयाबाई यांचं कुटुंब इंदापूर तालुक्यातील अकोल्याचं. ते शेती, भाती व्यवसाय करत बारामतीच्या कसब्यात स्थिरावतात. वडील नशीब काढायला म्हणून मुंबईला जातात. चाळीत जीवन काढतात. कारखान्यात काम करतात. पुढे स्वतःचा कागद पाकिटाचा कारखाना काढतात. पण जम कुठेच काही बसत नाही म्हणून स्वगृही येतात नि दुकान थाटतात.वडिलांना तीन अपत्ये झाली.काळूराम, माधव व सरू. काळूराम शाळेत शिकत असतानाच त्याला आपण मागासवर्गीय असल्याची जाणीव झाली ती नुसत्या खिडकीच्या गजाला हात लागला म्हणून भाकरी बाटल्याचा कांगावा करणा-या तथाकथित उच्चभ्रू वर्गाच्या विद्याथ्र्यांमुळे. जातीच्या आधारावर श्रेष्ठ, कनिष्ठता अमान्य असलेला काळूराम हेडमास्तरांना निरुत्तर, निष्प्रश्न करतो तेव्हा त्याचे तळहात रूळानी शेकले जातात. त्या अन्यायाने पेटून उठलेला काळूराम शिक्षण अर्धवट सोडतो ते राष्ट्रीय

प्रशस्ती/१३३