पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काँग्रेसची स्थिती भारतीय गायीसारखी आहे. दुधाच्या कामी नाही, शेणाच्या कामी नाही; पण दुष्काळ पडला तरी टिकून राहते, मरत नाही आणि धन्याला कधी अपरंपार श्रीमंतही करत नाही; तरीही ती ज्या कारणाने पूज्य ठरते, त्याच कारणाने काँग्रेसही लोकमान्य ठरते.
 तुकडे तुकडे झालेला हा देश पुन्हा एकसंध होईल, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाऱ्याच्या संपर्काने लोक अगतिकता सोडून देतील, त्या वेळी कदाचित दुसरा कोणी पक्ष काँग्रेसशी तुल्यबळ पकड सत्तेवर मिळवू शकेल. तोपर्यंत सर्व देशभर सर्वंकष सत्ता कोणी विरोधी पक्ष मिळवू शकेल अशी चिन्हे आज तरी नाहीत.
 पंतप्रधान नरसिंह रावांची आणि शरद पवारांची काँग्रेसबद्दलची बढाई वास्तवाला सोडून नाही. त्यांत काँग्रेसवाल्यांना कदाचित अभिमानही वाटेल, सगळ्या देशाच्या दृष्टीने काँग्रेसला पर्याय नसणे, ही मोठी दुर्दैवी घटना आहे.

(६ ऑगस्ट १९९४)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / ७१