पान:पायवाट (Payvat).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वामनराव चार वर्षांचे झाले तो अण्णा किर्लोस्कर वारले होते, इंग्लंडमध्ये नास्तिकाला लोकसभेत बसण्याची परवानगी मिळालेली होती, इब्सेनच्या नाटकाचा लंडनमध्ये पहिला प्रयोग होत होता. त्याच वर्षी भारतात पंचहौद चहा-बिस्किट प्रकरण झाले. हरिभाऊंची 'उपःकाल' कादंबरी आणि आगरकरांचा मृत्यू या वटना एकाच वर्षीच्या. ऑस्ट्रेलियाला वसाहतीचे स्वराज्य, नीत्शेचा मृत्यू , न्या. रानड्यांचा Rise of Maratha Power हा ग्रंथ, माडखोलकरांचा जन्म आणि हरिभाऊ मॅटिक होणे या घटना एकाच वर्षीच्या. वामनराव बी.ए. झाले त्या वर्षी चेकॉव्ह वारला. वामनराव एम.ए. झाले त्याच्या आधल्या वर्षी केशवसुत वारले; त्याच वर्षी इब्सेन वारला. मराठी वाङ्मयातील, महाराष्ट्रीय जीवनातील, जागतिक वाङ्मयातील आणि जगातील विविध घटनांचे आलेखन करून त्या कालपटात वा.लं.नी वामनरावांचे जीवन बसवून दिलेले आहे. या कालपटात उल्लेखिलेल्या घटना उगीचच व अनावश्यक नाहीत. वामन मल्हारांच्या सर्वांगीण आकलनाला या घटना उपयोगी आहेत; किंबहुना आवश्यक आहेत. एकेका व्यक्तीच्या अभ्यासासाठी किती चौरस तयारी करावी लागते याचे हा पट म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पुन्हा हे सांगितले पाहिजे की हे सारे वाङ्मयाचे आकलन आहे, मूल्यमापन नव्हे. वा. ल. कुलकर्णी ललित वाङ्मयाच्या वाङ्मयीन रसग्रहणाच्या पलीकडे इतरत्र कुठे जात नाहीत, अवांतर बाबींशी आपल्या वाङ्मय-विवेचनाचा संबंध येऊ देत नाहीत, असा वा.लं.च्या विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर व्हावा आणि त्यांच्या अभ्यासाचा चौरसपणा नीट समजावा, यासाठी म्हणून हा प्रपंच केला आहे. सोपे लिहिणारा माणूस अगर इतरांच्या भूमिकांची खंडन-मंडनपर चर्चा न करणारा माणूस हासुद्धा चौरस अभ्यासू असू शकतो, हे मुद्दाम सांगण्याची गरज वाटावी इतके वा.लं.च्या 'वाङ्मयीनते 'बाबत गैरसमज आहेत. काहीजण व्याकरण त्यांचा प्रांत नव्हे असे मानतात. काहीजण महानुभाव वाङ्मय त्यांची कक्षा नव्हे, असे मानतात. माझ्या माहितीप्रमाणे वा.लं.च्या आकलनाला अनेकविध बाजूंचा चौरसपणा आहे. त्यांच्या मूल्यमापनाची गती माहिमभट्टापासून शंकर पाटलांच्यापर्यंत व ज्ञानेश्वरांपासून ते विंदा करंदीकरांपर्यंत अकुंठित व अप्रतिहत आहे, हेही वा.लं.चे एक विलोभनीय वैशिष्टय म्हणावे लागेल.

 वा.लं.ची वाङ्मयसमीक्षेतील भूमिका कोणती १ खरे म्हणजे याबाबत वाद होऊ नये. कलेचे जग हे स्वायत्त, स्वयंपूर्ण जग आहे ही गोष्ट त्यांनी पुनःपुन्हा सांगितलेली आहे. ललित वाङ्मयाच्या मूल्यमापनात अवाङ्मयीन बाबींची लुडबूड असू नये असे ते सतत सांगत असतात. वाङ्मयाकडून नीतिबोधाची, उद्बोधनाची, समाजोन्नतीची अपेक्षा करण्यात वाचक हा वाङ्मयाकडे केवळ एक साधन म्हणून पाहत आहे. पण ललित वाङ्मयकृती ही केवळ साधन नव्हे, ती साध्य आहे. बोधवादाच्या चौकटी कलेतील जिवंतपणाला मारक ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे. वा.ल. एखादी गोष्ट एक वेळ सांगून थांबणारे लेखक नव्हत. या बाबीचा पुनरुच्चार त्यांच्या लिखाणात अक्षरशः शेकडो वेळा येतो. इतके म्हटल्यानंतर ते कलावादी आहेत हे सांगण्याची गरज पुन्हा पडू नये, पण

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ४९

 पा....४