पान:पायवाट (Payvat).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभव साकार करते तो अनुभव साचेबंद व सांकेतिक असणे ही एक निराळी बाव आहे. म्हणून संकेत तेच असूनसुद्धा व अतिशयोक्ती जाणवत असूनसुद्धा नरेंद्राचे 'रुक्मिणीवर्णन' जिवंत वाटते. हेच सर्व संकेत घेऊन मुक्तेश्वराने आपली जिवंत वर्णने सजविलेली आहेत. रघुनाथ पंडित आणि श्रीधरात संकेत हेच असूनही काव्याचा निर्जीवपणा जाणवतो. सरधोपटपणे संकेतप्राचुर्य असलेले काव्य निर्जीव आहे अगर हीन जीवनाच्या जाणिवा प्रकट करणारे आहे असे मानणे धोक्याचे असते.

 खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठेचा उदय विज्ञानाच्या पुरेशा वाढीनंतरच होत असतो. व्यक्तीला व्यक्ती म्हणून महत्त्व आले म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण तपासण्यावर भर दिला जाऊ लागतो. या व्यक्तिवैशिष्टयात कलावंत जाणूनबुजून रस घेऊ लागले म्हणजे मग वस्तुनिष्ठांचे उदय होतात. वस्तू जशा आहेत तशा, अगर वस्तू जशा कलावंतांना प्रतीत होतात तशा रंगविण्याची धडपड फार उत्तरकालात सुरू होते. पाश्चात्य जीवनात चित्रकलेतील Realism आणि Impressionism या दोन्ही घटना 'रेनेसान्स 'च्या नंतरच्या कालातील आहेत. आणि भारतीय जीवनात वस्तुनिष्ठेचा आग्रह इंग्रजी अमदानीनंतरच्या काळातील आहे. वस्तुनिष्ठेतून संकेतअवस्था निर्माण होत नाही. आदर्श व संकेताधिष्ठित वाङ्मयाची प्रतिक्रिया म्हणूनच मानवी संस्कृतीच्या विकसित अवस्येत वस्तुनिष्ठेचा आग्रह सुरू होत असतो. ही भूमिका इजिप्शियन संस्कृतीच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांतून किंवा आजच्या रानटी माणसांच्या, वन्य जमातींच्या कलाकृतींच्यामधून दिसून येईल. कलांच्या विकासात क्रमाने रंग नाजूक होत जातात. छटांचे प्रमाण वाढत जाते. मांडणीला महत्त्व येते. या अवस्थेच्या मागच्या काळात भडक रंगाची आवड व त्यांची परस्परविरोधी ठेवण उत्कटतेने दिसते. भडक रंगाने शरीरे रंगविणे ही बाब वन्य संस्कृतीत सर्वत्र सापडणारी अशी आहे. अभिजात कलेच्या उदयापूर्वी ही अवस्था येते, नंतर नव्हे.

 मग कालाच्या प्रवाहात क्रमाने वाङ्मय निर्जीव होत जात नाही की काय, याला माझे उत्तर होकारार्थी असे आहे. या ठिकाणी संकेतांचे दोन गट कल्पिणे महत्त्वाचे आहे. काही संकेत जीवनात रूढ असणारे व वाङ्मयात प्रकट होणारे असे असतात. पण काही संकेतांचे स्वरूपच वाङ्मयीन असे असते. हे वाङ्मयीन संकेत वाङ्मयाला साचेबंद स्वरूप आणतात. जीवनातले संकेत आणि वाङ्मयीन संकेत यांतील सीमारेषा पुसट आहे ही गोष्ट खरी, पण त्यांतील फरक आपण ओळखला पाहिजे. पहिल्या गटातील संकेतांचा आधार घेऊन अनुभव साकार होत असतो. दुसऱ्या गटातील संकेत अनुभवाला आपल्या चौकटीत मर्यादित करीत असतात. मध्येच वाङ्मय आणि कला यांच्यात बहिरंगप्राधान्याची एक लाट निर्माण होते. वाङ्मयाचे अगर कलाच वर-वाइटपण, जिवंत-निर्जीवपण या दुसऱ्या गटातील संकेतांवर अवलंबून असते. एखाद्या चित्राचा अगर शिल्याचा बरे-वाईटपणा त्यातील भुवया धनुष्याकृती आणि डोळ कमलाकृती आहेत की नाहीत यावर अवलंबून नसतो. रंग, रेपा, आकार व त्यांचे परस्पर ताल या आधारे

३८ पायवाट