व्हावा म्हणून फॅक्टरी मॅनेजर अल्तमश यांचा हा सारा खटाटोप. अलनूरलाही हा दर्प सहन होत नाही.
ब-याच कालावधीनंतर अलनूर कंपनीमध्ये आलेले आहेत.
त्यांच्यासमोर अल्तमश, फ्रिजिंग युनिटचे हयातखान आणि कामगारांचे प्रतिनिधी शिंदे आहेत.
टेबलावर ड्रायफुटसु ठेवलेले आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या. अलनूरच्या जाडजूड बोटात उंची तंबाखूचा सिगार पेटलेला.
‘शिंदे, अरे साला, तुम लोग सिर्फ तनखाह - बोनस की बात करता... कंपनी का प्रॉफिट कम होता जा रहा है...'
'हाँ हुजूर, गेल्या तीन वर्षांत या विभागात भरपूर पाऊस झाला, अन्नधान्यं झालं..... अल्तमश कामगार नेते शिंद्यांना कळावं म्हणून मराठीत बोलत होते, त्यामुळे जनावरांचे भाव फार वाढले होते...'
‘इस एरिया में बड़े से बड़े इंडस्ट्रीज से भी ज्यादा तनखाह हमारे वर्कर्स की है...' हयातखान.
‘पण किती घाण काम करावं लागतं साहेब!' शिंदे म्हणाले, 'या उग्र वासात आठ घंटे काम करणं म्हणजे निव्वळ नरकयातना बघा. लोकांना एक मिनिट वास नको वाटतो. कंपनीसमोर तरळदचा बसस्टॉप आहे; पण प्रवासी बस पुढे शंभर फुटांवर थांबते. कारण वास सहन होत नाही.'
'ठीक है, शिंदे...' अलनूर म्हणाले, 'इस साल बोनस बढ़ाने की मैं सोचता हूँ... लेकिन एक्स्पोर्ट बढना चाहिये.'
आणि चर्चा सुरू होते.
‘हुजूर - ए - आला...' हयातखान म्हणाले, ‘गये दो साल से चढे दाम से मार्केट से जानवर खरीदने पडे. इस साल भयानक अकाल पडा है, इस मुल्क में शेतकरी लोग अपने जानवर - बैल - भैसे जो मिला उस दाम से बेच रहे हैं. उसका कंपनी को बड़ा फायदा होनेवाला हैं. हमे कुछ नये तरीके अपनाने पडेंगे...'
अलनूरचा चेहरा उजळतो. ‘अच्छा तो ये बात है?'