पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘या सरपंचाचा ट्रॅक्टर आहे व त्याला काम हवंय म्हणून तो गावात पाणीटंचाईचा आरडाओरडा करून टॅकरची मागणी करतोय. शासनाकडे सरकारी टँकर वा ट्रॅक्टर नाहीत. खाजगी घ्यावे लागणार. म्हणजे याच्या ट्रॅक्टरला दररोज काम व भरपूर पैसे मिळणार.... ते मला टाळायचं होतं, म्हणून हा पर्याय व त्याला गर्भित धमकी की, गंगवालच्या विहिरीचे पाणी कमी पडलं तर तुमची घेऊ... टैंकर न लावणं हा युध्द जिंकण्याचा प्रकार, तर त्यांची विहीर अधिग्रहित न करणं चकमक हरण्याचा प्रकार.'

 प्रदीपला आपल्या जुन्या मित्राचा अभिमान वाटला. तो म्हणाला, 'यार पाटील, तुझ्याबरोबर आज दौरा करून मला खूप काही मिळालंय. प्रशासनावरील विश्वास - जिथं अनेक चांगले अधिकारी आहेत.....हा !'

 यापुढील गावात एका संस्थेमार्फत गुरांची छावणी उघडायची होती. त्यासंदर्भात पाहाणी व चर्चा होती. प्रदीप बारकाईनं तहसीलदारांच्या हालचाली व वर्तन पाहात होता. ही संस्था धार्मिक व राजकीय पक्षाशी संलग्न होती; पण शिस्त व चोखपणासाठी प्रसिध्द होती. तेथे पंचक्रोशीतील तीन तलाठी सज्जांमधील जनावरे ठेवण्याची योजना अंतिम केली, त्यांना दोन दिवसात पुरेसा चारा पाठवून देण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले.

 गावातल्या दोन कोतवालांची सकाळ - संध्याकाळची ड्यूटी लावून दिली. जवळच एक कारखाना होता. तिथल्या कार्यकारी संचालकांशी पाटील आधीच बोलले होते. त्यांच्याशी भेटून त्यांच्या मार्फत पाण्याचे टैंकर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाठविण्याचे आश्वासन मिळवले.

 एव्हाना पाच वाजत आले होते, ‘यार, फार वेळ झाला. तुला पैठणला जायचं आहे... चल, तिकडंच जाऊया. ही कामं संपणारी नाहीत.'

 ‘नको पाटील - आज जायचा मूड नाही. आपण परतूया. तुझं जेवण पण राहिलंय.'

 परतीच्या प्रवासात तीव्र दर्प आला, तशी प्रदीपनं प्रश्नार्थक मुद्रा केली. इथं बीफ फॅक्टरी आहे. यावर्षी त्यांची मजा आहे. कारण जनावरं त्यांना स्वस्तात मिळतात. मागच्या वर्षी उत्तम पीक-पाणी होतं, त्याच्या निम्यानंही आज मोठ्या जनावरांचे भाव राहिले नाहीत. या कंपनीचे दलाल गागोगावी जाऊन पडत्या भावात जनावरं खरेदी

दौरा / १५१