पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यात पुन्हा पाण्याचा सुरू झालेला त्रास, बौद्धवाड्यातला हापसा आटलेला गावात एक सामुदायिक विहीर होती. तिथं रोज या उन्हाळ्यात टँकरनं चार-पाच खेपा करून पाणी टाकलं जायचं.

 मघाशीच टँकर येऊन पाणी ओतून गेल्याची खबर मिळताच सारेजण घागरी - बादल्या घेऊन पळत सुटले. बुद्धवाड्यात बांधलेल्या समाजमंदिरात रखमा-भीमी निवांतपणे सुखदुःखाच्या गोष्टी करीत बसल्या होत्या. त्यांना उशिरानं हे समजलं, तशा त्याही उठल्या व पाण्यासाठी घागरी कमरेवर घेऊन निघाल्या.

 रखमा आसुसून तो चंपकशेठचा हिरवागार मला पाहात होती. नजरेत ते वैभव सुख आणण्याऐवजी काट्यासारखं सलत राहिलं. मग ती हलकेच म्हणाली,

 'भीमी, आपल्या गावात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी कमी पडतं; पण टँकर प्रथमच लावला गेला हो ना?”

 'व्हय रखने गेल्या साली या शेठ्जीची हीर सरकारनं ताब्यात घेतली व्हती व पाण्यासाठी खुली केली होती. बुद्धवाड्यासाठी लई सोईचं व्हतं बघ.'

 'मग यावर्षी काय झाले त्यांची विहीर अधिग्रहण न करायला? सारा गाव तहानलाय, माणसाला पाणी नाही; पण यांच्या उसाला व कडेच्या गाजर गवतालाही पाणी पाजलं जातंय...' रखमा म्हणाली, 'बरं ते जाऊ दे. आपल्याला लगबग करायला हवी. चल चल बघू...'

 'उलीसं थांब रखमे नदर फिरतीय बग' भीमीला अशक्तपणामुळे व अर्धपोटी अवस्थेमुळे चक्कर आल्यासारखं होत होतं. तिचा चेहरा पांढराफेक पडला होता.

 रखमाला गहिवरून आलं. ती म्हणाली, 'भीमे, काय गं तुझी ही दशा? तू इथं त्या झाडाखाली बसं. मी आणते तुझं व माझं पाणी माझी सवय हॉस्टेलला राहिल्यामुळे काही मोडली नाही अजून.'

 'अगं पन रखमे...' भीमीचं बोलणं अर्धवटच राहिलं, कारण गावातून बौद्धवाड्यातल्या चार-पाच बाया येत होत्या. या दोघींना पाहून त्यापैकी एक म्हणाली, बया-बया- बया... किती लेट भीमे - रखमे पानी संपलं की... आता पुना टँकर उद्याच्याला येनार...'

 त्या निघून गेल्यावर भीमी म्हणाली, 'आता कसं व्हायचं रखमे... घरट्यात पान्याचा थेंब पन नाय...'

 क्षणभर विचार करीत रखमा म्हणाली, 'मी असं करते भीमे... हे तारेच्या कुंपणावरून मळ्यात जाते... तिथल्या विहिरीवरचं पाणी आणते. कदाचित तिथं

मृगजळ/११७