२८ नोव्हेंबर
शेतकरी हा हिंदुस्थानच्या प्रगतीचा कणा आहे, हे केंद्रसत्य म. फुले यांनी स्वच्छपणे ओळखलेले होते.
हा कणा सर्वत्र मोडून पडलेला ते पहात होते.
टिळकही ही वस्तुस्थिती समजावून घेत होते. लहान, स्वतंत्र शेतकऱ्याचा मृत्यु त्यांना स्पष्ट दिसत होता. पुणे जिल्ह्यातच, टिळक तरुण असताना, शेतकन्यांचे एक बंड उसळलेले होते. दुष्काळात टिळक महाराष्ट्रभर फिरले. शेतकन्यात त्यांनी जागृतो उत्पन्न केली. त्या वेळीही त्यांना या केंद्रसत्याची महती चांगलीच प्रत्ययास आलेली होती.
फुले आणि टिळक या दोघांनी शेतकरी खंगत-मरत असलेल्या डोळ्यांनी पाहिला. या संहाराची मीमांसा मात्र वेगवेगळी केली.
फुल्यांनी भटशाहीला मुख्यतः जबाबदार धरले. टिळकांनी सर्वांनाच गुलाम करून टाकणाचा परकीय इंग्रज सत्तेला दोष दिला.
गावोगावचा भट-सावकार उखडला व त्याचेजागी एखादा कर्तव्यदक्ष निःपक्षपाती गोरा अधिकारी आणून ठेवला की, शेतकऱ्यांची दुर्दशा संपेल, असा फुल्यांचा विश्वास होता. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या चळवळीचा मांड मांडला. संस्था वगैरे काढून भटशाहीविरोधाचे मोठेच रान महाराष्ट्रात पेटवून दिले.
टिळकांनी हेच नेमके इंग्रजांबाबत केले. कारण शेतकरी वर्गाचा व एकूणच हिंदी जनतेचा, क्रमांक एकचा शत्रू इंग्रज आहे, देशी भट-भिक्षुक किंवा शेठसावकार नव्हे, असे त्यांचे मत होते.
सोने काठीला बांधून आता कुणीही हिंदुस्थानभर प्रवास करावा, वाटेत चोर-दरोडेखोर-पेंढाऱ्यांचे भय नाही. रेल्वे आली, तारायंत्रे-पोस्टांचे जाळे विणले गेले, शाळा निघाल्या, सुधारणांचे युग अवतरले, कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले असे म्हणन ब्रिटिशांचे स्वागत करणाऱ्या मवाळांच्या भूमिकेशी फुल्यांची भूमिका मिळतीजुळती राहिली.