पान:निर्माणपर्व.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 यासाठी आमची स्वतंत्र राज्याची मागणी करावी लागेल. पाकिस्तान सारखा तो आदिवासी खंड राहील अशी जनजागृती का करू नये ? आमच्याकडे सरकार, शासनकर्त्यांचे लक्ष नसेल तर आम्ही खरोखरच हिंदुधर्माचा त्याग करून झारखंड, नागालँडसारख्या खंडाची उभारणी केल्यास वावगे होणार नाही, याची जाणीव असू द्यावी.

 धळे जिल्ह्यात पावसाळ्यानंतर जमिनीचे वाटप होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पडीत जमिनी आहेत त्याचे वितरण त्या त्या तालुक्यातील जिल्ह्यातील आदिवासी मध्येच केले गेले पाहिजे. ते आसाम, इन्दौर, भोपाळच्या सैनिकाला देता येणार नाही याची खबरदारी घ्यावी. नाहीतर शेवटी सामाजिक आंदोलन करून रक्तपात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही यांचीही अॅडव्हान्स इन्टीमेंट देत आहोत.

 शहादे तालुक्याची परिस्थिती केव्हा भयानक रूप धारण करील, आज सांगणे कठीण आहे. प्राणावर आले, की तो माणस बदलतोच...

१८-१०-७०

 पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गेलेले एक पत्रही दप्तरी दाखल आहे. या पत्रातील भाषेने तर संयमाची सर्व बंधने ओलांडली आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता पंतप्रधानांना उघड उघड सवाल केला आहे : आम्ही हातात कुऱ्हाड, भाला, बरची घेऊन आमचेवरील अन्यायाचा प्रतिकार का करू नये?'
 --' मरू किवा मारू'
 --' खून का बदला खून से'
 --' ठोशास ठोसा'
 --' रक्तक्रांती'
 ---अंतर्गत खळबळीला या शब्दांतून अगदी मुक्तपणे या पत्रात वाट करून दिली गेलेली आहे.



 पण सगळे व्यर्थ. अंबरसिंग पोलिसांच्या काळ्या यादीत मात्र या पत्रामुळे नोंदला गेला. त्याच्यावर पाळत ठेवली जाऊ लागली.

 खुट्ट वाजले, की अंबर सिंग त्यात गोवला जाई.

 -- पाडळद्याला, त्याच्या जन्मगावी या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एक गडबड झाली. झोपड्या जळाल्या.

शहादे । २९