पान:निर्माणपर्व.pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण सांगता येईल,
 येथील जनविराट जागृत करण्याची कोणालाच आवश्यकता वाटली नाही.
 नेहरूंनी आणि इंदिराजींनी शासनसंस्थेवर केवळ भर दिला. वरवरचा जनस्तुतीवादाचा सोपा मार्ग स्वीकारला.
 या जनस्तुतीवादाचे युग संपले तरच नेहरूयुग संपले असे म्हणता येईल
 पण यासाठी जनहितवादाची कास धरायला हवी, अप्रिय पण पथ्यकर धोरणांचा धैर्याने, सातत्याने पाठपुरावा करायला हवा.
 जनतेला यासाठी शिक्षित आणि संघटित करण्याचे लांब पल्ल्याचे कार्य केल्याशिवाय असे धैर्य, केवळ लोकसभेत बहुमत आहे म्हणून, एखाद्या राजकीय पक्षाला दाखवता येत नाही, हा आजवरचा अनुभवही ध्यानात धरायला हवा
 यासाठी सत्तेची आणि सेवेची एक क्रांतिकारक एकजूट घडवून आणावी लागेल.
 आणि हे घडून आले तरच भारतीय मृगेन्द्र त्याचे इतिहासदत्त कार्य तडीस नेऊ शकेल.
 आज तो फक्त जागा झाला आहे.
 ही त्याची जागा अल्पकालीन न ठरो.

२६ मार्च १९७७




निर्माणपर्व । १६०