पान:निर्माणपर्व.pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनीती यांचे भय त्यांना नव्हते. आसुरी सत्ताकांक्षा हाच त्यांच्या राजनीतीचा पाया होता. अशी राजनीती काही नेत्रदीपक चमत्कार घडवून आणू शकते, पण नवसमाज निर्मितीची पायाभरणी करू शकत नाही. ज्या धक्कातंत्राने इंदिराजींचा राजकीय प्रवास सुरू होता, त्या तंत्राचा, हा धक्कादायक शेवट अटळ होता. त्यांच्या मुलाने, तो शेवट, आपल्या अविवेकाने लवकर खेचून आणला, इतकेच. अनुशासनाशिवाय राष्ट्रीय प्रगती अशक्य असते हे खरे. पण अनुशासन केवळ लादलेले असून चालत नाही. जनतेचा स्वयंस्फूर्त पाठिंबा त्यामागे उभा असावा लागतो. ही जनतेची स्वयंस्फूर्ती इंदिराजींनी मारून टाकली. हळूहळू भ्रष्टता वाढत गेली, त्यांच्या राजवटीचा, टोळक्याच्या कंपूशाहीत अधःपात झाला. विदूषक आणि खुषमस्करे यांच्या गोतावळ्यात त्या पूर्ण अडकल्या. कारण महत्कार्याची ओढ होती, पण व्रतनिष्ठेचे ककण हाती नव्हते. ते असते तर, हा दुर्दैवी राजकीय . अंत, ही पराभवाची शोकांतिका त्यांना सहज टाळता आली असती. २५ जूनपर्यंत आणीबाणी लादली जाईपर्यंत तरी जनता त्यांच्यावर प्रेमच करीत होती. या प्रेमाचा इंदिराजींनी इन्कार केला आणि सत्तामदाने त्या अधिकाअधिक धुंद आणि उन्मत होऊ लागल्या. न्यायअन्यायाची चाड संपली, ख-याखोट्याचा विधिनिषेध उरला नाही. सत्तला सेवेची जोड असती तर हे असे झाले नसते. कुठे तरी कुणाचे तरी एकले गेले असते. ज्या प्राचीन परंपरेचा अभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला होता, त्यातील मौलिक भागाचे त्यांना विस्मरण व्हायला नको होते. विनोबांना जव्हा त्यांनी दूर सारले, जयप्रकाशजींना, संघाला जेव्हा त्यांनी शतुस्थानी मानायला सुरुवात केली. साधुत्वाची, शुचित्वाची परंपरा जेव्हा त्यांनी लाथाडली, तेव्हा त्यांच्या राजवटीचे उरलेसुरले नैतिक अधिष्ठान संपुष्टात आले आणि मग कवळ दडपणे थोडी सैल होण्याचा अवकाश पुरला. लोकक्षोभाचा प्रचंड वणवा भडकला आणि त्या, त्यांचा मुलगा, त्यांचे सर्व टोळके, संपूर्ण नेहरू राजवटच या वणव्यात सापडून इतिहासजमा झाली.
 ‘विनाशकाले विपरीत बुद्धी-' दुसरे काय म्हणायचे या अंतपवला?


 मात्र राजवट अशी इतिहासजमा झाली तरी तिचा वारसा डोळसपणे भाळावा लागतो. त्यात नवीन भरही घालावी लागते.
 समर्थ आणि स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न इंदिराजींना का पूर्ण करता आले नाही? त्यांच्या वडिलांनाही, ते लोकशाहीवादी असूनसुद्धा, या कामी अपयश का जाल, याचा नीट शोध घेतला गेला तरच अशी नवीन भर या ऐतिहासिक वारशात घालता येईल.

 येथील जनतेचे सामर्थ्य आपण नीट ओळखले नाही हे एक महत्त्वाचे

भारतीय मृगेन्द्र । १५९