पान:निर्माणपर्व.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



करण्याचा अंबरसिंगचा प्रयत्न चालूच असतो. तरी ठराव बारगळतात, प्रतिज्ञा विसरल्या जातात. मग असा एखादा कबुली जबाब लिहून घ्यायचा आणि गाडे पुढे ओढीत राहायचे -

तारीख १५।५।७०

 मि नामे परशराम एलजी भील लेखी पंचासमोर लिहून देतो की पाडळदे गावामध्ये दारूबंदी केल्यामुळे पाडळदे गावात दारू कोणी पित नाही आणि दारू पिऊन भिलाटीमध्ये शांततेचा भंग केला आहे. त्यानुसार मला भिलाटीमधील लोकांनी तसे सांगितले व ताकिद दिली आणि एवढेच नाही तर मला त्यांनी मारहान केली म्हणून मि पंचासमोर हात जोडून विनंती करतो की यापुढे अशी चुकी होणार नाही असे मी वागेन आणि दारूबंदीचा भंग भिलाटीमध्ये करणार नाही अशी माझी दोघे हात पंचासमोर जोडून नम्र विनंती आहे.

सही XXX

साक्षदार १, २, ३, ४.

 पूर्णविराम नसलेली, ऱ्हस्वदीर्घाची शुद्ध गेलेली, विरामचिन्हे, अनुस्वार हरवलेली, मोडक्यातोडक्या मराठीतली पत्रे, अर्जविनंत्या यांचा अंबरसिंगकडे असा ओघ सुरू होता. गुजरपाटील वर्तुळात तो अप्रिय ठरणे आता स्वाभाविकच होते. दबलेला आदिवासी समाज या माणसामुळे थोडा धिटावतो अहे, अन्यायाच्या प्रतिकाराची हवा हळू हळू निर्माण होते आहे, याचा अर्थ काय ? हे वेळीच थांबवले पाहिजे ! अंबरसिंगाबरोबरच त्याच्या संस्थेची पाळेमुळेही उखडून टाकली पाहिजेत ! यासाठी कानाला कान लागू लागले. कंड्या पिकल्या, पसरल्या. अंबरसिंगबरोबर सातपुडा सर्वोदय मंडळाचा उद्धारही होऊ लागला. एक मित्र लिहितो (२१-५-७०)-

 श्रद्धेय अंबरसिंगभाई याचे सेवेशी

 आपण पाठविलेली टपाल मि ठिक १२ वाजेला पोचती केली आहे. त्यानुसार सोबत पाकिटात मि रजिस्टर पावती पाठविली आहे कळावे. दादा साक्षीसाठी गुजर लोक फकीरा पुरमल याला जबरदस्तीने मोटारीत १० रुपये रोज देऊन नंदुरबारला घेऊन गेले आहेत. त्याजबरोबर नेहरूनगरमधील २ इसम आहेत त्यांचे नाव मला माहीत नाही. मात्र एक आपल्याच भिलाटीतील फकीरा हा तर उघडच आहे. दुसरे असे की पाडळदे गावातील सजातीय गुजर समाजातील बायांचे म्हणणे आहे की अंबरसिंग हा भूदानमधले सर्व पैसे चोरून घेतले आहे व तिकडे भरून दिले आहे. त्यामुळे आपल्या गुजर लोकांना त्रास देत आहे. तसेच इतर दुसऱ्या गोष्टी म्हणजे शेती ही काय अंबरसिंगच्या बापाची थोडी

शहादे । १५