हे पान प्रमाणित केलेले आहे.
परस्परांपासून तुटलेला. वर्ण आणि वर्ग, भाषा आणि धर्म या भितींमुळ एकमेकांपासून दुरावलेला.
हा जागा करायचा. एका मानवचैतन्याने, एकात्म भावनेने प्रस्फुरित करावयाचा !
त्याशिवाय हे धुळीत लोळणा-या, घाणीत बुडालेल्या देशाचे चित्र कसे पालटणार ? एकात्म राष्ट्र म्हणून हा देश कसा उभा राहणार ?
आजवर · विराट ‘चा शोध फक्त इतिहासात घेतला गेला. आता त्याचे अधिष्ठान 'वर्तमान' झाले पाहिजे. विराटाचे भान असणायांनी वर्तमानाची उपेक्षा केली. वर्तमानात वावरणान्यांना विराटाचे भान नव्हते. हा वियोग आता संपत आहे हे सुचिन्ह आहे. तळागाळातून या जनविराटाचे हुंकार आता उमटू देत.
दिल्ली काबीज करण्यापेक्षा हे केवढे तरी महत्त्वाचे कार्य आहे.
दहा-पाच वर्षे जरी हे कार्य निष्ठेने, (दृढतेने केले तर गेल्या हजार वर्षांचा इतिहास याने बदलून जाईल.
५ मार्च १९७७
जनविराट । १५५