पान:निर्माणपर्व.pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सन्मान्य अपवाद



 जगजीवनराम यांचा घाव तर अगदी मर्मावर पडलेला दिसतो. किरकोळ मेळाव्यांसमोर पंतप्रधानांना खुलासे करीत राहण्याची पाळी आली. नभोवाणीवरून जगजीवनरामांच्या कृत्याचे चिल्लर पुढाऱ्यांकडून केले गेलेले निषेध सतत ऐकवले जावेत, इतकी पाळी एरव्ही राज्यकर्त्यांवर येती ना. निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधानांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल. सर्व विरोधी पक्ष इतक्या त्वरेने आणि मजबुतीने एक होऊन निवडणुकीचे आव्हान स्वीकारतील अशी बाईंची कल्पना नव्हती. पण तुरुंगातून सुटून आल्यावर पंधरवडा उलटायच्या जातच हा चमत्कार घडून आला. बाईंना बसलेला हा पहिला धक्का होता.

 पाठोपाठ जगजीवनरामांचा राजीनामा हा दुसरा धक्का. याचे निवडणुकीवर परिणाम होतील, किती जागा काँग्रेसला यामुळे गमवाव्या लागतील, याचे आताच बांधणे कठीण आहे. कारण सत्तेची आणि पैशाची दडपणे अगदीच दुर्लक्षून चालणार नाहीत. पण बाईंचा वचक या एका राजीनाम्यामुळे एकदम कमी, युवक काँग्रेसच्या तथाकथित नेत्यांची मस्ती जिरली; बाईंच्या एकमुखी सत्तेला तडा गेला; त्यांच्याबद्दल वाटणारी भीती कमी झाली; देशातील दहशतीचे वातावरण थोडेफार निवळले यात काही संशय नाही.

 बाईना आता पक्षातील जुन्या व निष्ठावंत सहका-यांवर अधिक अवलंबून राहावे लागणार हे उघड आहे. हे जर झाले नाही तर सत्ता हळूहळू विशिष्ट टोळक्याकडे आपोआप जात राहील आणि बाईंनाच हे टोळके, हा भस्मासुर डोईजड झाल्याशिवाय राहाणार नाही.

 बाई जर लोकशाहीवादी असतील तर पहिला पर्याय पसंत करतील. म्हणजे ओघानेच यशवंतराव चव्हाण वगैरे ज्येष्ठ व निष्ठावंत सहका-यांचे अवमूल्यन थांबेल आणि त्यांचा सल्ला अधिकाधिक घेतला जाईल, मानला जाईल. घेतलेले निर्णय त्यांना फक्त ऐकवण्याची गेल्या दीडदोन वर्षातली प्रक्रिया बंद पडेल.

 या मंडळींचे हे स्थान अधिक बळकट कसे होईल, हे नव्या जनता पक्षानेही

-१०
सामान्य अपवाद । १४९