पान:निर्माणपर्व.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येऊन बाकी सर्व १००-१५० लोक बाहेर शांततेचा भंग करून मला मारून टाकण्याची धमकी देत होते. तशात दर्शविलेला इसमाने माझे कापणीचे धान्य (दादर-ज्वारी) ही सर्व एकूण १।। मण काढून घेऊन गेला होता. सदरचे धान्य मला आजपावेतो मिळाले नाही. सध्या माझी गरिबीची परिस्थिती असल्यामुळे माझी मुलेबाळे आता उपाशी राहतात. करिता माझे गेलेले धान्य मला सुरक्षितपणे मिळून देतील ह्या अपक्षेने धाव घेत आहे. तसेच सध्या उद्योगधंद्यालासुद्धा वाव मिळू देत नाहीत. तरी त्यांच्या धास्तीतच मी माझे जीवन कंठित आहे. तरी कृपादृष्टीने सदरच्या आडदांड लोकांपासून भिती बंद करून माझे धान्य सत्वर मिळवून देतील हीच विनंती.

सही-सिताराम लिबा

 अर्जदार : मंगी भ्रतार दुल्या भील रा. पाडळदे बु. विनंतीपूर्वक अर्ज करिते की -
 मागे आमचे गावात गुजर व कोळी समाजाचे लोकांनी दंगा उपस्थित करून आमचे समाजावर भयंकर असा अन्याय केलेला आहे. सदर प्रसंगी आम्ही सर्व एकूण १२ बाया भुईमुख शेंगा सरवा करण्यास गेलो असताना आम्हाला शेतातच १ : श्री. भाईदास मदन २ : उद्धव छगन ३ : रमण भाईदास इत्यादी लोकांनी आम्हा स्त्री जातीला इज्जत सोडून वागणूक करून परत गावातील मजीतच्या घरात कोंडून ठेवले व छेडछाड करून लाकड्यांनी मारले व आमचे जवळून प्रत्येकीकडून जबरदस्तीने ७ रुपये वसूल केले आहेत व बलात्कार करून आमची इज्जत चौवढ्यावर आणली. तरी सदर लोकांनी आमच्या स्त्री जीवनाची हानी केली. त्यावर म. सदर लोकांबाबत योग्य रीतीने चौकशी करून आमची झालेली नुकसानभरपाई करून मिळून देण्याची व्यवस्था करावी. तसेच आम्ही वेचून आणलेल्या शेंगाच्या गाठोड्या प्रत्येकीजवळ सुमारे १० किलोप्रमाणे होत्या. त्यासुद्धा सोसायटीत जमा करून घेतल्या आहेत. करिता विचार करण्यात यावा.

आंगठा-मंगी भ्र. दुल्या

 भिलाटीत-भिल्ल वस्तीत दारू फार. भिल्लांना-आदिवासींना-दारूच्या पिपातून बाहेर काढणे हे महाकठीण कर्म. निघता निघता घसरतील, बाहेर निघाले तरी पुन्हा आत उड्या घेतील. आदिवासींमधून एखादा गडकरी जन्माला आला तर बहुधा तो आपल्या नाटकाचे नाव 'एकच प्याला' न ठेवता ‘एकच पीप' असे ठेवील. सभा घेऊन, वरचेवर प्रतिज्ञा वदवून घेऊन, पंचांमार्फत ठराव वगैरे संमत करवून घेऊन या व्यसनातून भिल्ल-आदिवासींची सोडवणुक

निर्माणपर्व । १४