पान:निर्माणपर्व.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
तळ नाही तोवर बळ नाही





 खूप मोहोर आलेला पण फळ न धरलेला आम्रवृक्ष असावा तसे मानवेन्द्र रॉय यांचे जीवन होते.

 फळ का धरले नाही, याची चिकित्सा विद्वानांनी, कार्यकत्यांनी अवश्य केली पाहिजे.

 पण वठलेल्या झाडांचे दाट जंगल सध्या माजले आहे. निदान मोहोर आलेले एक झाड तरी पाहावे, म्हणून 'माणूस मानवेन्द्रनाथ रॉय' विशेषांकाचा हा प्रपंच.

 आणि कुणी सांगावे, मागील हंगामात मोहोर गळून गेला तरी, पुढच्या एखाद्या हंगामात हा वृक्ष फळांनी डवरणार नाही म्हणून ? कदाचित खूप वर्षांनी फळ देणाऱ्या आम्रवृक्षाची ही एखादी वेगळीच जात असेल.

 कदाचित एखादी नवीन कलमजोड केल्यावरच या वृक्षाला फळे धरणार असतील.

 तोवर हा वृक्ष दृष्टीआड जाऊ नये, यासाठी ही अंकाची धडपड.

 'स्वातंत्र्य' हे रॉय या वृक्षाचे नाव. हा लहान होता तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी हा फुलला-बहरला.

 हा मोठा झाला तेव्हा श्रमिकांच्या, शेतकरी-कामगारांच्या स्वातंत्र्याचा याने ध्यास बाळगला.

 पुढे ही क्षितिजेही त्याला लहान-अपुरी वाटली.

 तो मानवी स्वातंत्र्याची विशाल स्वप्ने पाहू लागला.

 ही स्वप्ने पाहता पाहताच, तो वृद्ध होण्यापूर्वी चिरनिद्रित झाला.

 हिमालयाच्या कुशीतच याने आपली जीवितयात्रा संपवली.

 स्वातंत्र्य हे स्वप्नच असे आहे की, वास्तवात आणायला जावे तो ते लांब लांब पळते, अनेकदा भंगूनही जाते.

निर्माणपर्व । १३४