पान:निर्माणपर्व.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही बातमी एका आदिवासीने त्यांचा मुख्य गणपत पालद यास कळविली. गणपत आपले काही सोबती घेऊन चिकड्याहून निघाला. ट्रॅक्टरवाल्यांचा पाठलाग केला. ते म्हसावदला पळून आले व तेथे दोन्ही गटात बाचाबाची झाली. आदिवासी १५-२० होते. त्यांच्या हातात तिरकामठे होते. गुजर मात्र जास्त संख्येने व वाहनासहित आणि हत्यारासहित होते. आदिवासी तीर चालवायचे, गुजर आपली बंदूक-पिस्तोल चालवायचे. यात एका आदिवासीला गोळी लागली व (तो) ठार झाला. एकाला नाकाजवळ गोळी लागली. तो जिवंत आहे. याप्रमाणे घडल्यावर पुलीसयंत्रणा जोरात चालू झाली व शेकडो आदिवासींना पकडले व मारहाण केली. अजून मारहाण चालूच आहे. जे आदिवासी अटकेत आहेत त्यांची नावे बंडिंग सुपरवायझर श्री. बी. आर. पाटील यांच्याकडून घेतलीत. कारण सर्व आदिवासी बंडिंगच्या कामावर जात होते. याप्रमाणे पाटीलवाडी प्रकरण घडले.

 अटकेत असलेले आदिवासी पिरग, लक्कडकोट, म्हसावद, आनकवाडे, आवगे, सुलवाडे, पाडळदे इत्यादी गावचे आहेत.
 शहाद्याला सरकारी डॉक्टर गुजर समाजाचे आहेत. म्हणून त्यांनी मेलेल्या माणसाचा खोटा रिपोर्ट दिला की, बंदुकीच्या गोळीने मेलेला नाही. तीरकामठ्याने मेला आहे. प्रेत नदीत पुरले. नंतर डी. आय. जी. आले. त्यांनी प्रेत (उकरून) धुळ्याला पाठविले. तेथे आदिवासीच्या शरीरातून दोन गोळया निघाल्या.


 म्हणजे म्हसावदला दोन समाजात दोन मे या दिवशी दुपारी एक लढाईच जुंपलेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही लढाई थांबलेली नव्हती. रतीलालच्या वरील पत्रात न आलेला या लढाईसंबंधीचा आणखी काही तपशील असा आहे-
 सुरुवातीला जरी आदिवासींची संख्या रतीलालने कळविल्याप्रमाणे १५-२० असली तरी लवकरच ती वाढली. 'आपला एक माणूस गुजरांनी ठार केला, ही बातमी वणव्यासारखी पसरली व आसपासच्या गावातून बराच मोठा आदिवासी समाज हत्यारे सरसावून म्हसावदला गोळा झालेला होता.
 चिडलेल्या व बदला घेण्याची भाषा बोलणाऱ्या आदिवासींवर ताबडतोब गोळीबार वगैरे न करता परिस्थिती थोडी संयमाने व समजुतीने हाताळण्याचा प्रयत्न करणारे पोलीस सबइन्स्पेक्टर भावसार कामावरून तात्पुरते बडतर्फ झालेले आहेत. (suspended)

 ठार झालेला आदिवासी गुजर समाजापैकी एखाद्याच्या हातून बंदुकीच्या गोळीने मेला नाही, दुसऱ्या आदिवासीच्या तीरकामठ्याने तो मेला, असा पुरावा

निर्माणपर्व । १०