पान:निर्माणपर्व.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धोका निर्माण झाला नव्हता. काँग्रेसची ती पिछेहाट होती. तिच्या अधिसत्तेला मुळापासून धक्का बसलेला नव्हता. जयप्रकाश चळवळीमुळे हा मूळ धक्का आता बसत आहे, कारण हे शस्त्र दुधारी आहे. एक बाजू नैतिकतेची, दुसरी राजकीय काँग्रेसजवळ राजकीय बाजू उलटविण्यासाठी लागणारे बळ व कौशल्य भरपूर प्रमाणात अजूनही आहे. निवडणुका जिंकणे, हा दिल्लीश्वरांच्या हातचा मळ आहे. पण केवळ निवडणुका जिंकून राज्य करता येत नाही. लोकांचा राज्यकर्त्यांवर विश्वास असावा लागतो. राज्यकत्यांच्या विश्वासार्हतेचे हे अधिष्ठानच जयप्रकाश आज काढून घेत आहेत. म्हणून दिल्लीचा एवढा जळफळाट आहे. विनोबांच्या भेटीला तरी इंदिरा गांधींनी पुन्हा पुन्हा जायचे कारण काय ? झपाट्याने घसरत असलेली आपल्या पक्षाची नैतिक बाजू थोडीफार सावरून धरता आली तर पाहावी, यासाठी केला गेलेला हा सर्व अट्टाहास. सर्व सेवा संघ फुटला असला, विनोबा बाईंना आतून अनुकूल असले, तरी ही घसरगुंडी थांबणे आता शक्य नाही. मग जयप्रकाश बिहारमध्ये निवडणुका जिंकोत किंवा हरोत. बाईचे ७१ चे स्थान आता पुन्हा त्यांना दिसणार नाही हे निश्चित.

 जयप्रकाशांची संपूर्ण क्रांतीची कल्पना आज तरी धूसरच आहे. तिचा ढोबळ आशय इतकाच जाणवतो, की बदल केवळ एका क्षेत्रात करून चालणार नाही. बदल सर्वंकष हवेत. राजकीय आणि सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांत क्रांतीचे वारे वाहायला हवेत. राजकीय क्षेत्रातील बदल जयप्रकाशांनी थोडेफार स्पष्ट केले आहेत. निवडणुका पैशाच्या जोरावर होऊ नयेत. निवडून आलेल्या उमेदवारांवर मतदारांचा सतत अंकुश हवा; वेळ पडली तर त्याला परत बोलावण्याची सोय हवी; त्याची मिळकत दरवर्षी जाहीर व्हावी; तो कुठल्याही एका पक्षाचा प्रतिनिधी असू नये; आपल्याला निवडून देणा-या मतदारांचा प्रतिनिधी म्हणून त्याने काम करावे, असे बदल जयप्रकाशांना राजकीय क्षेत्रात तूर्त अभिप्रेत दिसतात. सामाजिक क्षेत्रात जातिनिर्मूलनावर व हुंडाबंदीवर त्यांचा भर विशेष दिसतो. शैक्षणिक क्रांतीचे महत्त्व जयप्रकाशांनी अनेकवार सांगितलेले आहे. पण पर्यायी शिक्षणक्रमाचा आकृतिबंध त्यांनी अद्याप तरी मांडलेला नाही. शाळा कॉलेजांवर बहिष्कार पुकारा, इतकेच ते म्हणतात. एक खरे की, अशी पर्यायी शिक्षणव्यवस्था तपशीलात जाऊन मांडणे ही काही जयप्रकाशांची एकट्याचीच जबाबदारी नाही. इतरांनीही जबाबदारीचा वाटा उचलला पाहिजे. तरी पण या विषयात जयप्रकाशाकडन अधिक स्पष्टतेची अपेक्षा बाळगणे चूक नाही. शाळा-कॉलेजे सोडली तरी पुढे काय हा प्रश्न लक्षावधी पालकांना आणि विद्याथ्र्यांना भेडसावल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा मोकळा झालेला विद्यार्थीवर्ग जयप्रकाशांच्या कार्यात समील झाला,

निर्माणपर्व । १०६