पान:निर्माणपर्व.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण हे वारे शिडात भरले जायला हवे असतील तर पुनर्रचनेचा ठोस कार्यक्रम हाती घ्यायला हवा. हा कार्यक्रम राबवणारी यंत्रणा तयार हवी. निदान त्या दृष्टीने आतापासूनच पावले पडायला हवीत. महाराष्ट्रातून काही तरुण बिहारमध्ये कामासाठी जात आहेत अशी वार्ता आहे. निदान या तरुणांनी तरी हा खोल आशय जयप्रकाशांच्या आंदोलनात ओतण्याचा कसून प्रयत्न करायला हवा. नाहीतर निवडणुका जिंकल्या तरी संपूर्ण क्रांती पराभूत होईल आणि हा पराभव पचवणे मग भारतातील लोकशाहीला फार जड जाईल.

 होय. भारतातीलच म्हटले पाहिजे. कारण 'भारतीय' लोकशाहीचा जाधुनिक अविष्कार अद्याप प्रकट व्हायचा आहे. जयप्रकाशांचे आंदोलन ही या प्रकटीकरणाचीच एक नांदी आहे.

जानेवारी १९७५



नित्य आणि नैमित्तिक । ९९