Jump to content

पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४. उदक ‘किती वेळा सांगितलं सिद्धार्थ - करुणा की, उन्हात खेळू नका म्हणून. जा त्या झाडाखाली बसून खेळा. घरात पाणी नाही प्यायला, सांगून ठेवते. उन्हात खेळून तहान - तहान कराल!' प्रज्ञानं पुन्हा एकदा आपल्या उन्हात खेळणा-या भाच्यांना हटकलं व सावलीकडे पिटाळलं. काटेरी बाभळीच्या झाडांची सावली ती, तरीही रणरणत्या दुपारी उन्हात खेळण्यापेक्षा तिथं झाडाखाली बसून खेळलेलं त्यातल्या त्यात बरं, असा तिचा हिशोब होता. मघाशी त्यांना घागरीतून पाण्याचा शेवटचा पेला प्यायला दिला होता; कालपासून तांड्यावर टॅकरचा पत्ता नव्हता. परवाही टॅकरच्या चारऐवजी फक्त दोनच खेपा झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक घराला नेहमीपेक्षा अर्धच पाणी मिळालं होतं व ते मघाशी संपलं होतं. भाच्यांना पुन्हा तहान लागण्यापूर्वी पाणी यायला हवं आणि हे आपल्यालाच पाहायला हवं. दादा रोजगार हमीच्या कामावर भल्या पहाटे गेलेला आणि वहिनी केव्हाही बाळंत होऊ शकेल. कालपासून तिच्या वेणा सुरू आहेत. तिची पण कडक उन्हानं लाही होतेय. तिच्यासाठी वेगळं घोटभर पाणी राखून ठेवलंय. प्रज्ञा आपल्या झोपडीबाहेर आली. एका टेकडीवर वसलेला हा नवबौद्धांचा तांडा. पाच वर्षांपूर्वी इथं सवर्णांच्या बहिष्कारामुळे यावं लागलेलं. गावापासून दूर, उंच टेकडीवरील पठारावर. इथं चार - सहा जणांची नापीक व खडकाळ जमीन होती व पाणी! पाणी!! / १९९