सर्वांचे मत आहेच. वा० ल० कुलकर्णी म्हणतात, तसा हा प्रवेश 'चटा'वर चदिशी उरकला आहे; जणू काही शुक्राचार्य आणि कच दोघांनीही देवयानीचा जो साधनात्मक उपयोग (इन्स्टुमेन्टल यूज ) करून घेतला आहे. त्यामुळे आता तिच्यासमोरून पळून जाण्याची त्यांना घाई झालेली आहे असे वाटते. कच किंवा शुक्राचार्य या दोहोंपेक्षा देवयानीचीच व्यक्तिरेखा अखेरीस सहानुभूती घेऊन जाते. शुक्राचार्य आणि कच यांच्या वर्तनातील अपरिहार्यता कोठे स्थापित झालेली जाणवत नाही. 'विद्याहरण' हे मदिरापानाचा निषेध करणारे नाटक आहे, असे म्हटले जाते. मदिरापानाचे दुष्परिणाम दोन पातळ्यांवर दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शुक्राचार्यासारख्या महान तपस्व्याच्या जीवनात मदिरापानाने निर्माण झालेले अटळ दुःख आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना (देवयानी) आणि सांप्रदायिकांना जे नुकसान सहन करावे लागले, त्याचे चित्र एका पातळीवर; दुसरीकडे शुक्राचार्याचा म्हणजे दैत्यांचा संप्रदायच मदिरेला प्रतिष्ठा देणारा आहे. त्यामुळे या संप्रदायातील अन्य व्यक्ती - त्यांचे प्रतिनिधित्व शुक्राचार्याचे शिष्य मधुकर ऊर्फ फुकट्या आणि शिष्यवर हे करतात. रसिका नावाची एक दासी त्यांच्याबरोबर आहे. खाडिलकरांच्या नाट्यरचनेच्या सवयीनुसार कथानक ज्या तात्त्विक आधारावर उभे असते, त्याचे मुख्य कथानकातील स्थान- वरच्या पातळीवर आणि त्याचेच सामान्य पातळीवरील स्थान उपकथानक - पर्यायाने गौण आणि काल्पनिक पात्रांद्वारे ते दाखवतात. त्याची मुख्य कथानकाशी सांधेजोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ही दुय्यम पात्रे विनोद निर्मितीसाठीही वापरली जातात. त्याचा एक दुष्परिणाम सर्वच नाटकांवर जो झालेला दिसतो, तोच येथेही झालेला आहे. विनोद निर्मितीसाठी ज्यांचा वापर केला जातो, त्या व्यक्ती पात्रे हास्यास्पद, मूर्ख असतात. आता शुक्राचार्याचा पट्टशिष्यच जर हास्यास्पद आणि मूर्ख असेल, तर त्यातून शुक्राचार्यालाही कमीपणा येत नाही का ? विद्याहरणातील शिष्यवर आणि मधुकर हे नुसतेच मूर्ख नाहीत, तर अनेकदा ते बीभत्सही होतात. अंक २ मधील ‘दारूपोई'चा तिसरा सर्वच प्रवेश या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. त्यातील मांसाचे पर्वत आणि दारूचे ओहळ हे सगळे बीभत्स - किळसवाणे आहेच, पण त्या आधीच्या प्रवेशातील- - मांसा तैसे रुधिरा । मानू आम्ही मदिरा । प्राणचि आम्हा दारू, माता, कांता मारु ॥ धृ० ॥ (अं० २, प्र० २) हे सगळेच पद खाडिलकरांना अपेक्षित परिणाम करीत नाही. उलट विपरीत परिणाम करते. अतिरिक्त मद्यपानाने तळीराम मेला, तर दुःख होत नाही; मात्र सुधाकराच्या संसाराचे मात्र मातेरे झालेले पाहून मन व्यथित ९६ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/९९
Appearance