________________
यांचा नवीन अन्वयार्थ लावणे, हे कामही ललित लेखक करताना दिसतो आणि पुराणकथेतील घटिते आणि व्यक्ती एकपरीने पुराण असूनही त्यांची नवीनता प्रकाशमान करीत असतो. मानवी जीवनातील शाश्वत गूढ तत्त्वे प्रकाशात आणतो. हे करीत असताना खरेखुरे पौराणिक नाटक पुराणातील चमत्कारांवर आधारलेले अद्भुत पचवून जीवनातील स्थलकालातीत ठरणाऱ्या शाश्वत नाटकावर प्रकाश टाकीत असते. प्रत्यक्ष जीवनातील वर्तमान घटना किंवा लेखकाचे तत्त्वज्ञान यांचे पौराणिक कथेवर कलम करून तेच तत्त्वचिंतन म्हणून मांडले जाते, तेव्हा ते कृत्रिम होण्याची शक्यता असते. जेव्हा पौराणिक कथेतून ते आपसूक फुलून येते, तेव्हा ते कलारूप घेते. - 'विद्याहरण' ची कथा ही एक पुराणकथा – लोकप्रिय पुराणकथा आहे. नाटक- कारांना या कथेचे पहिल्यापासूनच मोठे आकर्षण वाटत आलेले आहे. अगदी विष्णुदास भावे यांच्या 'कचदेवयानी आख्याना' पासून ते खाडिलकरांपर्यंत ८-१० नाटके याच कथेवरील उपलब्ध आहेत. खाडिलकरांचे 'विद्याहरण' ज्या (१९१३) मध्ये प्रकाशित झाले, त्याच वर्षी कृष्णाजी हरी दीक्षित यांचे 'देवयानी अर्थात् विद्यासाधन' या नावाचे नाटक प्रकाशित झाले. महाभारतातील या पुराणकथेचा सारांश असा : देव-दानव यांचे सनातन हाडवैर. त्यातच दानवगुरू शुक्राचार्य आणि देवगुरु बृहस्पती यांच्या वैयक्तिक वैराची भर पडते; परंतु शुक्राचार्याजवळ मृतसंजीवनी विद्या असल्याने राक्षसांची सारखी सरशी होत राहते. अखेर शुक्राचार्याकडून ही विद्या हस्तगत करण्यासाठी बृहस्पतीपुत्र कच देवलोकातून राक्षसलोकात येतो. शुक्रकन्या देवयानी आणि कच परस्परानुरक्त होतात; परंतु राक्षसांच्या उतावळेपणाने आणि कपटी वर्तनाने कचाचा वारंवार वध केला जातो. अर्थातच देवयानी शुक्राचार्याकडून कचाला प्रत्येक वेळी जिवंत करवते. अखेर त्याची राख शुक्राचार्याना दारूतून पाजवली जाते, तेव्हा कच त्यांच्या मर्मस्थानी गेल्याने त्याला आपोआप संजीवनीची प्राप्ती होते. त्यामुळे शुक्राचार्य मेले, तरी कच त्यांना जिवंत करतो; परंतु आता कच- देवयानीचे नाते बदलते. शुक्राच्या उदरातून कच बाहेर आल्याने तो तिचा 'सहोदर' होतो. देवयानीला हे सहन न होऊन ती त्याला 'त्याची विद्या सफल होणार नाही,' असा शाप देते. कच देवलोकी परत जातो. तेथे तो इतरांना संजीवनी विद्या शिकवतो, पण ती षट्कर्णी झाल्याने तिचा प्रभाव संपतो. मूळ कथानकात काही फेरफार करण्याचा अधिकार ललितलेखकांना असतोच. कालिदासानेही 'शाकुंतल' नाटकात या अधिकाराचा उपयोग करून घेतला होता. त्याप्रमाणे खाडिलकरांनी आपल्या सर्वच नाटकांतील पौराणिक कथांमध्ये थोडेफार ८८ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर