Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाहीत. कोणत्याही सत्तांध, जुलमी, मदोन्मत्त सत्ताधाऱ्याचे प्रतीक म्हणून कीचक खाडिलकरांना अपेक्षित असो की नसो, पण त्यांच्या समीक्षकांना तसा वाटला होता. निदान तसे म्हणण्याची प्रथा पडली होती. आज हे नाटक जन्माला येऊन सुमारे शतकाधिक वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर 'कीचकवधा'ला हे कालनिरपेक्ष मूल्य फार क्षीण प्रमाणात आहे, असे जाणवते, हे मान्य करावे लागेल. तीच अवस्था खाडिलकरांच्या अन्य प्रतीक नाटकांची! दुसरे असे की, खाडिलकरांची पात्रे काही नमुने (टाइप्स) म्हणूनच जाणवतात, याचा उल्लेख पूर्वी आला आहेच. खाडिलकरांच्या पात्रसृष्टीची तुलना शेक्सपिअरच्या व्यक्तिरेखांशी केली जाते; पण शेक्सपिअरचा 'हॅम्लेट' जशी एक जिवंत व्यक्तिरेखा म्हणून मनाच्या तळात रुतून बसते (किंवा कोणतीही व्यक्तिरेखा), तशी खाडिलकरांची व्यक्तिरेखा स्वतंत्रपणे जिवंत व्यक्तिरेखा न वाटता खाडिलकरच तिचे कर्ते-करविते असल्याचे जाणवते. तसा प्रत्येक लेखकच आपल्या व्यक्तिरेखेचा कर्ता-करविता असतो; पण तसे ' असणे' आणि 'जाणवणे' यात फरक असतो. लेखकाच्या मानससृष्टीतील या बाहुल्यांमध्ये मोठ्या कौशल्याने प्राण फुंकून त्यांना चालत्या बोलत्या केल्याचे जाणवत राहते. ते तसे होत नाही. खाडिलकरांचे कोणतेही पात्र साधे, स्वाभाविक, मनुष्यसुलभ वावरताना किंवा बोलताना दिसतच नाही. ' ही माणसे खाजगी बोलोत अथवा जाहीर, ती व्याख्याने दिल्यासारखीच बोलतात,' ह्या प्रा० कुरूंदकर यांच्या विधानात तथ्य आहे, असे ती भाषणे बारकाईने पाहताना जाणवते. उन्मत्त कीचक द्रौपदीची अब्रू घेण्यासाठी तिच्या पाठीस लागलेला असताना द्रौपदी जाहीर सभेत बोलल्यासारखी बोलते, 'बाईसाहेब, माझ्या पातिव्रत्याचा भंग करणारे हे नीच काम मला सांगून बायकांचा दुर्गुण वाढलेला पाहून साध्वींना आनंदच होतो, असा आपल्या निष्कलंक कीर्तीचा दुलौकिक का करून घेता ? (अं० २, प्र० २) अशा छापाचीच सर्व भाषणे आहेत. व्यक्तीच्या स्वाभाविक मानसिक क्षोभातून, खळबळीतून ती आली आहेत, असे न जाणवता ती नाटकातील कृत्रिम, वरवरची भाषणे असल्याचे जाणवते. त्यातील जोर, आवेश आणि अभिनिवेश स्वतःच्या वेदनेतून, अनुभवातून पिकून आलेल्या स्वाभाविक उद्रेकाचा नसून जाहीर व्याख्यात्याच्या व्याख्यानाचा आहे. खाडिलकरांची प्रतिभा बहिर्मुख वृत्तीची आहे, ती अशी. खाडिलकर आणि गडकरी दोघांच्याही नाटकांतून अशी लयबद्ध, ठसकेबाज आणि ‘कान दिपवणारी, मनाला गुंगी आणणारी हमखास टाळीची वाक्ये पावलापावलावर सापडतात. त्यात नाटकीपणा आणि भडकपणा,. .आक्रमक- नाटककार खाडिलकर ८५