Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६. प्रेमध्वज (१९९०) - व्याज ऐतिहासिक ७. सं० मानापमान (१९११) - काल्पनिक ८. सं० विद्याहरण (१९१३) पौराणिक 1 ९. सत्त्वपरीक्षा (१९१४) - पौराणिक १०. सं० स्वयंवर (१९१६) - पौराणिक ११. सं० द्रौपदी (१९२०) - पौराणिक १२. सं० मेनका (१९२६) - पौराणिक १३. सवतीमत्सर (१९२७) - पौराणिक १४. सं० सावित्री (१९३३) – पौराणिक १५. सं० त्रिदंडी संन्यास (१९३६) - पौराणिक या पंधरा नाटकांपैकी 'सं० मानापमान' हे एकच पूर्ण काल्पनिक, चार ऐतिहासिक आणि सर्वाधिक १० पौराणिक नाटके आहेत. मराठी नाटकांचा जन्मच मुळी विधिप्रधान दशावतारासारख्या पौराणिक नाटकातून झाला आहे. खाडिलकरांची सर्वाधिक नाटके पौराणिक आहेत. त्यामुळे पौराणिक नाटकांची प्रथम चर्चा करणे योग्य होईल. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यानंतरचे खरे पौराणिक नाटककार खाडिलकरच. पौराणिक कथेची पारंपरिक धार्मिकता टाळून आणि नाट्यप्रयोगातील विधिप्रधान टाकून शुद्ध रंजनमूल्य असलेले आणि 'संगीत' विशेषणाने युक्त असे 'सं० सौभद्र' मराठी रंगभूमीला देऊन अण्णांनी एक नवीन युगारंभ केला. इंग्रजी वा संस्कृत कोणाचेच अनुकरण न करता धर्मनिरपेक्ष लौकिक (सेक्युलर) नाटकाची निर्मिती करून खास मराठी नाटकाचे तंत्र किर्लोस्कर यांनी निर्माण केले आणि एक स्वतंत्र रंजनमूल्य पौराणिक नाटकाला दिले. पुराणकथेवर - दैवतकथेवर नाटक रचणे, हे एकपरीने सोपे आणि एकपरीने फार कठीणही आहे. समाजमनाने स्वीकारलेली, लोकप्रतिभेने निर्माण केलेली आणि धार्मिक पवित्र अधिष्ठान असलेली दैवतकथा समाजमनात खोलवर रुजलेली असते. अशा कथेतील कथावस्तू, घटिते आणि व्यक्तिरेखा सर्वश्रुतच असतात. नवनिर्मितीचा खटाटोप नाटककाराला फारसा करावा लागू नये, असे वाटते. म्हणून विद्यमान कथेला नाट्यरूप देणे एक प्रकारे सोपे असते. बरंवर सोपी वाटणारी ही गोष्ट वस्तुतः कठीण असते. कारण दैवतकथा दिसते तितकी साधी आणि सरळ नसते. अनेक संदर्भसूचकत्व हा तिचा जन्मजात गुण असतो. बदलत्या युगमान-संदर्भात नवनवीन शक्यता एकाच कल्पनाबंधातून (मोटिफ ) प्रतिभावंताला जाणवत असतात. अशा वेळी दैवतकथेचा कोणता ६६ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर