________________
३ व्यक्तिवैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक चिंतनशीलता आ युष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांचे सर्व लक्ष वैदिक विचार आणि • उपनिषदे यांविषयीच्या तत्त्वचिंतनात गुंतले होते. त्यांची सांगलीच्या दत्तमंदिरातील प्रवचने असोत, मुंबईची प्रवचने असोत की, इंदूरसारख्या महाराष्ट्रा- बाहेरील मराठी प्रांतातील प्रवचने असोत, सर्वत्र त्यांनी आपल्या आध्यात्मिक विचारांचाच प्रसार केला. 'ज्ञानेश्वरी'वरही त्यांनी प्रवचने दिली. कधी घरातच चार- दोन समविचारी व्यक्तींसमोर ते विवेचन करत. असे असले तरी, येथपर्यंत पोहचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक परस्परविरोधी गुणावगुणांनी त्यांना त्याचे बरे-वाईट परिणामही भोगावे लागले होते. त्यांच्या एकूण कार्याच्या विवेचनाच्या अखेरीस त्याचा विचार झाला, तर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन यथायोग्यपणे होईल, असे वाटते. काकासाहेबांच्या 'स्मरणी'त अनेकांचे स्मृतिलेख आहेत. त्यावरून खाडिलकरांच्या व्यक्तिमत्त्वाची दोन परस्परविरोधी वैशिष्ट्ये अनेकांनी नोंदवली आहेत. त्यातील बहुतेकांनी काकासाहेब संतापी आणि संयमी होते, असे म्हटले आहे. खुद्द टिळकांनाही खाडिलकर 'हॉट' - संतापी असल्याचे माहीत होते आणि ट्रस्ट संबंधीच्या चर्चेसाठी काकासाहेबांसमोर टिळकांनी तसा उल्लेखही केला होता. ते शीघ्रकोपी होते. मनाजोगते काही घडले नाही की एकदम उसळायचे; वरच्या पट्टीत ओरडून बोलायचे, ही त्यांची वृत्ती होती. नंतर चूक लक्षात आली किंवा समोरच्याच्या चुकीच्या मानाने आपले शब्द कठोर होते, संताप तीव्र होता, असे लक्षात आले की, ते शांतपणे चूक दुरुस्तही करीत; परंतु हा विवेक ऐन तरुणवयात नव्हता. मग गैरसमज होत. अनुभवाने विवेक, संयम वाढला. कोप मात्र होताच. त्याचे एक उदाहरण - काकासाहेबांच्या नात्यापैकी एकाची 'नवा काळच्या मॅनेजरपदी त्यांनी नियुक्ती केली होती. आर्थिक जमा-खर्चाच्या चौकशीत काकासाहेबांना काही चूक आढळली. चूक गंभीर होतीच. काकासाहेब एकदम ५२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर