Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे न्यायमूर्ती होते. 'टिळक आणि दावर' ह्या त्या काळात लिहिलेल्या लेखावरून टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाची थोरवी ठसठशीतपणे व्यक्त होते. या कालखंडातील शेवटचा लेख 'एका वर्षात पारडे फिरले' हा आहे. यात 'म० गांधी यांच्या आत्मबलाधिष्ठित चळवळीसंबंधी केलेल्या उपदेशाचा पुरस्कार एकापरीने काकासाहेबांच्या पत्रकारितेतील उत्तरार्धाच्या भूमिकेचा सूचक आहे, ' असा या खंडाच्या प्रस्तावनेत न० २० फाटक यांनी केलेला उल्लेख पुरेसा बोलका आहे. या सर्वच लेखांतून काकासाहेबांचा चौफेर व्यासंग, मार्मिक अवलोकन, त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान, त्यांची भाषाशैली, भाषाशैलीतून व्यक्त होणारा मतांचा ठामपणा आणि जोरकसपणा, लेखनाला असलेला वक्तृत्वाचा बाज अशा कितीतरी वैशिष्ट्यांचा प्रत्यय येतो. ' लेखांची निवड मी करून ठेवली आहे. लेखसंग्रह माझ्या हयातीत प्रसिद्ध न होऊ शकला, तर माझ्या मागून प्रसिद्ध होईल, ' हे काकासाहेबांचे उद्गार प्रकाशक आणि काकासाहेबांचे चिरंजीव यशवंत खाडिलकर यांनी 'आभार' या प्रास्ताविकात दिले आहेत. यावरून काकासाहेबांच्या मुखातून जणू नियतीच भविष्यवाणी बोलून गेली होती, असे वाटते. खाडिलकरांच्या निवडक लेखसंग्रहाच्या दुसऱ्या भागात त्यांचे १९९८ ते १९२० मधील ‘केसरी'तील लेख, 'लोकमान्य' आणि 'नवा काळ' मधील १९२९ पर्यंतचे म्हणजे एकूण संपादकीय कारकिर्दीच्या अखेरपर्यंतचे लेख आहेत. याखेरीज काकासाहेबांची नाट्य संमेलनातील, कीर्तन संमेलनातील आणि साहित्य संमेलनातील व्याख्याने आहेत. 'केसरी'तील लेखांची निवड काकासाहेबांनी स्वतःच करून ठेवली होती. 'नवा काळ'मधील लेखांची निवड त्यांच्या पश्चात करण्याचा प्रसंग आला, तेव्हा काकासाहेबांनी 'केसरी'तील लेखांची निवड करण्याची जी पद्धती स्वीकारली होती, त्याच पद्धतीला वाट पुसत 'नवा काळ' मधील लेखांची निवड केली आहे,' असे या खंडाच्या प्रास्ताविकात प्रकाशकांनी नमूद केले आहे. या खंडाची प्रस्तावनाही न० र० फाटक यांनी लिहिली आहे. टिळकांच्या निधनानंतर १९२१ मध्ये त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने टिळकांवर लिहिलेल्या लेखांपैकी जेवढे उपलब्ध झाले, तेवढ्यांचाच विचार करणे शक्य झाल्याचे फाटकांनी म्हटले आहे; पण तेवढ्यावरूनही टिळकांविषयी काकासाहेबांच्या मनात असलेला परम आदर, त्यांच्या विद्वत्तेविषयीचा दबदबा, राष्ट्रकार्याचे आकर्षण, 'गीतारहस्याचा प्रभाव', नाट्यक्षेत्रात राहूनही सत्शील वृत्तपत्रीय कार्य : केसरी ४७