Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नव्हता; पण 'जामीन घेऊन सोडावे', या अर्जाची दाद घेऊन हायकोर्टाने जामीन दिला. मॅजिस्ट्रेटनेही खटला हायकोर्ट सेशन्सकडे पाठविला. हे सर्व झटपट दोन-तीन दिवसांत घडवून आणण्याचे श्रेय बाळासाहेब खेर आणि के. एफ. नरीमन यांच्याकडे जाते. 'विविधवृत्त'चे रामभाऊ तटणीस यांनीही खूप प्रयत्न केले. तांत्रिक आणि कायदेशीर कारणांनी काही अडचण येऊ नये म्हणून काकासाहेबांचे संपादकपद कोणाकडे द्यावे, यावर चर्चा होऊन काकासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री० यशवंत कृष्ण खाडिलकर ऊर्फ अप्पासाहेब यांच्याकडे संपादकपदाची जबाबदारी दिली, ती कायमचीच. म्हणजेच त्यांनी यानंतर संपादकीय लेखन केले नाही. आर्थिक जमा-खर्चावर त्यांचे लक्ष असे. अग्रलेखांचे वाचनही करीत किंवा करवून घेत. चर्चा करीत. अखेर हायकोर्टात खटला सुनावणीला गेला. भुलाभाई देसाई यांच्याकडे आठ दिवस खल चालला होता. सातारचे दादासाहेब करंदीकर स्वतः होऊन या चर्चेसाठी आले होते. हायकोर्टात मार्चमध्ये खटला सुरू होऊन दोन दिवसांत निकाली निघाला. ज्यूरींमध्ये काळ्यांपेक्षा गोऱ्यांची संख्या जास्त होती. त्यांनी काका- साहेबांना गुन्हेगार ठरविले. ज्यूरींच्या बहुमतानुसार काकासाहेब शिक्षेस पात्र ठरले. काकासाहेबांना एक वर्षाची साधी कैद आणि दोन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली. अशाही परिस्थितीत शिक्षा ऐकताच शेजारी उभ्या असलेल्या उप- संपादकाला खाडिलकर म्हणाले, 'दंडाचा भार आपण 'नवा - काळ 'वर पडून देणार नाही. तुरूंगात एक-दोन नाटके लिहून आपण दंडाची रक्कम वसूल करू. आरोपीच्या पिंजऱ्यातून काढून पोलीस काकासाहेबांना नेत असताना युसूफ मेहेरअल्ली यांच्या नेतृत्वाखाली अडीच-तीन हजार लोकांचा जमाव हायकोर्टाला गराडा घालून ब्रिटिश राज्याच्या विरोधात घोषणा देत होता. त्या रात्री आझाद मैदानाजवळच्या प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटच्या कचेरीतील तळमजल्यावरील एका कैद्यांच्या कोठडीत त्यांना ठेवले होते. बाळासाहेब खेर आणि एक प्रमुख संपादक तेथे गेले आणि काकासाहेबांना घरचे जेवण देण्याची परवानगी मिळवली. पुन्हा ते दोघे काकासाहेबांच्या घरी गेले. जेवण घेऊन दोन्ही चिरंजीवांसह उपसंपादक पुन्हा कोठडीकडे गेले. जेलच्या नियमानुसार जेवणाची परीक्षा करून ते काकासाहेबांना दिले. सर्व जण दीर्घ काळ खुच्र्यांवर बसून गप्पा मारत होते. त्यात प्रामुख्याने 'नवाकाळ'च्या भावी वाटचालीबद्दल चर्चा झाली. रात्री १२ नंतर घरची मंडळी गेली आणि काकासाहेबांना कोठडीत नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९|| वाजता त्यांना भायखळा जेलमध्ये नेले आणि तेथून काही दिवसांनी त्यांची साबरमतीच्या जेलमध्ये रवानगी झाली. त्या दिवसाची ४४ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर