________________
विरोधात 'सर्व' भारतीयांची ताकद एक होणे महत्त्वाचे आहे, याची टिळकांना खात्री पटली होती. कारण १९९४ मध्ये टिळक सुटून आले, तेव्हाच पहिले महायुद्ध सुरू झाले होते. अशा वेळी भारतीय बळाचा रेटा वाढला, तर सरकारला दुबळे करणे सोपे जाईल. म्हणून पक्ष पंथातीत ऐक्य महत्त्वाचे होते. लखनौ (Luck Now असे टिळकांनी लक्षणेने म्हटले होते.) काँग्रेसमध्ये टिळकांचा हा संदेश व्यक्त झाल्यानंतर काकासाहेबांनी त्या दृष्टीने लेखन सुरू केले. १९१८ मार्चमध्ये अधिकृतपणे काकासाहेब 'केसरी'चे संपादक झाले. ते १९२० जूनपर्यंत 'केसरी'त होते. त्या काळातही आधीच काकासाहेबांना प्रतिकूल असलेल्या घटकांनी आपली उपद्रवक्षमता सुरू ठेवलीच होती. परिणामतः टिळकांच्या निधनानंतर 'केसरी'च्या ट्रस्टींमधून खाडिलकरांना वगळले गेले. त्याची थोडी पार्श्वभूमी अशी. मंडालेहून आल्यानंतर 'केसरी' 'मराठा' संस्था आपल्या पश्चात नीट चालाव्यात म्हणून काही कायमची व्यवस्था करण्याचे टिळकांच्या मनात होते. त्यासाठी एक ट्रस्ट करावा आणि त्यात काकासाहेबांचा समावेश असावा, या दृष्टीने टिळकांनी काकासाहेबांशीही विचार-विनिमय केला होता, अशा प्रकारचा उल्लेख ‘स्मरणी'मध्ये खाडिलकरांनी केला आहे. १९२० मध्ये लो० टिळकांनी 'केसरी' द्विसाप्ताहिक करण्याचे ठरवले आणि ट्रस्टची योजना मुक्रर केली. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘मी ‘केसरी'चा ट्रस्ट करण्याचे ठरवले आहे आणि तुम्हाला एक ट्रस्टी करणार आहे. याबद्दल मी प्रथम तुम्हाला विचारीत आहे. तुम्ही हॉटी- रागीट आहात, हे मला माहीत आहे. म्हणून प्रथम तुम्हाला विचारीत आहे.' ('स्मरणी', पृ० ४२) यावर काकासाहेबांनी दिलेल्या उत्तरानुसार 'केसरी' आणि 'मराठा' यापैकी कोणत्याही एका पत्राची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर सोपवावी. त्याच्या धोरणाची कुलमुखत्यारी आपल्याकडे राहावी. असे केल्यास आपली ट्रस्टी होण्यास मान्यता आहे. ' तेव्हा द्विसाप्ताहिक 'केसरी' काकासाहेबांकडे राहावा, असे ठरले. त्या वेळी केळकरांनीही त्याला मान्यता दिली होती. नंतर 'द्रौपदी' नाटक पूर्ण करण्यासाठी खाडिलकर गेले; मात्र टिळकांच्या निधनानंतर टिळक पुत्रांनी जो ट्रस्ट . केला, त्यात काकासाहेब खाडिलकरांचे नाव नव्हते. त्याच्या मागच्या कारणाचा शोध घेता ‘केसरी'ची पूर्ण जबाबदारी काकासाहेबांवर सोपविण्यास टिळक पुत्रांचा विरोध होता असे समजले आणि काकासाहेब 'केसरी' मधून कायमसाठी बाहेर पडले. 'केसरी'शी १८९६ पासून असलेला ऋणानुबंध १९२० मध्ये सुमारे चोवीस-पंचवीस वर्षांनंतर कायमचा संपला. वयाच्या ऐन चोविसाव्या वर्षी 'केसरी'त आलेले खाडिलकर अठ्ठेचाळीसाव्या वर्षी - पन्नाशीकडे जात असताना वृत्तपत्रीय कार्य : केसरी ३५