________________
या काळात स्वदेशी, परकीय मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार, स्वदेशी, सहकारी विक्री केंद्रांची स्थापना या सर्वांच्या प्रचारासाठी टिळक महाराष्ट्रभर फिरत होते. त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या (काँग्रेसच्या ) कार्याबद्दल समाजमनात काही काळ आलेली उदासीनता झटकली गेली. विशेषतः स्वदेशी आणि बहिष्कार चळवळींमुळे समाजात चेतना निर्माण झाली. टिळकांवर १९०८ मध्ये राजद्रोहाचा दुसरा खटला भरला गेला. यापूर्वी १८९८ मध्ये पहिला खटला भरला गेला होता आणि त्याबद्दल त्यांना दीड वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या दोन्ही वेळेला टिळकांवर ज्या लेखांचे निमित्त करून खटले भरले होते, त्या दोन्ही वेळचे 'केसरी'तले लेख खाडिलकरांनी लिहिले होते. येनकेन प्रकारेण टिळकांना कारावास घडविण्यासाठी सरकार निमित्त शोधत होते. अशा वेळी संबंधित लेखांचे लेखक खाडिलकर असून त्यांचे नाव पुढे करणे अनेक कारणांसाठी सोयीचे नव्हते. एकतर खाडिलकरांनातर शिक्षा झालीच असती, शिवाय दुसरे कोणतेतरी निमित्त काढून टिळकांनाही सरकारने अडकवले असते आणि ‘केसरी'चे स्वीकृत कार्य मंदावले असते; खेरीज प्रमुख संपादक म्हणून टिळकांवर अधिक जबाबदारी होतीच. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या मंडालेचा कारावास या काळात टिळकांना भोगावा लागला. सुटकेबद्दलचे फ्रिव्ही कौन्सिलचे अपील तेव्हा फेटाळले गेले. याच काळात टिळकांनी 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला. अखेर १९९४ मध्ये टिळकांची कारागृहातून मुक्तता झाली. या काळात १९०८ जुलैमध्ये 'केसरी'च्या संपादकपदाची जबाबदारी खाडिलकरांवर आली. १९०८ च्याच ऑक्टोबरमध्ये न० चिं० केळकरांकडे असलेली 'मराठा'च्या संपादकपदाची जबाबदारीही खाडिलकरांकडे आली. 'मराठा' हे वृत्तपत्र इंग्रजीतून निघत असे. खाडिलकरांचे इंग्रजी चांगले नाही. या सबबीखाली दोन्ही पत्रांच्या संपादकपदाची जबाबदारी आपल्याकडे असावी, असा न० चिं० केळकर यांचा प्रयत्न होता. टिळकांच्या शिक्षेनंतर दोन्ही पत्रांचे डिक्लेरेशन कोणाच्या नावाने करायचे याबद्दल वाद चालू होते. त्यांनी पुढे उग्र स्वरूप धारण केले. ‘दोन्ही पत्रांवर एकाच व्यक्तीचे नाव असले आणि पुन्हा खटल्याचा प्रसंग आला, तर एकच व्यक्ती अडकेल आणि दुसरी कार्यभार स्वीकारण्यास मुक्त राहील,' अशी वरवर पाहता बिनतोड आणि सोज्ज्वळ भूमिका न० चिं० केळकर यांनी घेतली होती. तरी दोन्ही वृत्तपत्रे आपल्या एकट्याच्याच नावे असावीत, असा मतलबी स्वार्थ त्यांच्या मनात होता. अखेर बऱ्याच वादविवादानंतर एक ३२ । नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर