Jump to content

पान:नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरणाचा प्रस्ताव आणि पूर्ण पाठिंबा लो० टिळकांचाच होता, हे स्पष्ट होते. वासुकाका जोशी यांनी परत आल्यावर काकासाहेबांना ही हकिकत सांगितल्यावर * त्या कामावर जाण्यासाठी मी (काकासाहेब) तयार झालो, ' असे काकासाहेबांनी लिहिले आहे. दरम्यान नेपाळच्या सरसेनापतींशी माताजींनी त्यांची गाठ घालून द्यावी, असे पत्रव्यवहारातून ठरले. कारण नेपाळचे महाराज नामधारी असून खरी सत्ता सेनापतींचीच असते. त्यावेळी चंद्रसमशेर बहाद्दरसिंग हे सेनापती होते. पत्रव्यवहारानुसार वासुकाकांसह काकासाहेब कलकत्त्याला गेले. वेळ जाऊनही त्यांची भेट झाली हे महत्त्वाचे ! त्या मुलाखतीत 'तुम्हाला कौले तयार करायला येतात का ?' या प्रश्नाला वासुकाकांनी त्वरित होकारार्थी उत्तर दिले. नेपाळच्या राजवाड्याचे काम चालू होते आणि त्यावर घालण्यासाठी कौलांची गरज होती. या बैठकीनंतर दोघेही पुण्याला परत आले आणि नंतर काकासाहेबांचा या कामी अधिक उपयोग होईल, असे वासुकाकांना वाटले. त्यानुसार काकासाहेबांनी नेपाळला जाण्याचे ठरले. खरे तर 'नेपाळात रायफली तयार करण्याचे यंत्र न्यायचे आणि तेथे जाऊन रायफली तयार करायच्या, अशी मूळ कल्पना होती.' त्यासाठी यंत्राची व्यवस्था करायची होती. त्यावेळी यंत्राचे नकाशे ग्वाल्हेरला केतकर यांच्याकडे होते. त्यासाठी आवश्यक असे अडिचशे रुपये अमरावतीचे श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्याकडून घेतले. नकाशे मिळवले. जर्मनीच्या क्रप्स कारखान्याचे एजंट त्यावेळी कलकत्त्याला होते. त्यांच्यामार्फत यंत्राची ऑर्डर दिली. त्यासाठी आवश्यक पाच हजार रुपयांसाठी सर्कसवाले छत्रे यांची मदत झाली. मेकॅनिक केतकर यांना चंद्रसमशेरसाहेबांनी आपला शस्त्रास्त्रांचा कारखाना दाखवला होता. तो केतकरांनी चालवावा, असे बोलणे झाले; पण आर्थिक व्यवहार जमला नाही. नेपाळला जाण्याची पूर्वतयारी म्हणून काकासाहेबांनी तीन महिने छत्रे यांच्या सर्कशीत काढले. 'तेथे असताना मी घोड्यावर बसण्यास शिकलो. बंदूक पूर्वी हाताळली होती,' असे खाडिलकर लिहितात. त्याचे स्पष्टीकरण देताना 'सांगलीस असताना गाडगीळ सराफांकडची बंदूक घेऊन गाडगीळ वकील, सिनप्पा कोतवाल यांसह हरिपूर वाटेवर नेमबाजीचा सराव केला होता,' असे लिहिले आहे. अशी पूर्वतयारी करून काकासाहेब प्रथम कलकत्त्याला माताजींकडे गेले. तेथेच मुक्काम होता. बरोबर स्वयंपाकाची थोडी भांडी नेली होती. स्वयंपाक स्वतःच करीत. नेपाळला गेल्यानंतर काही दिवसांनी स्वयंपाकी नेमला. माताजींकडे मुक्काम असताना माताजी सकाळ-संध्याकाळ खूप गप्पा मारीत आणि नेपाळची माहिती देत. काही दिवसांनी नेपाळचा माणूस आल्यावर वृत्तपत्रीय कार्य : केसरी २७