________________
साहेबांचे वस्तुस्थितीचे वर्णन एथवर ठीक आहे. वस्तुस्थितीच्या वर्णनाचा भाग आला की, मतांत द्वैत क्वचितच सापडेल; परंतु वस्तुस्थितीला सोडून कार्य - कारणाच्या विचारात प्रिन्सिपलसाहेब भ्रमण करू लागले की, सत्य जाणण्याची इच्छा करणान्यास त्यांचे बरोबर जाऊन सोय लागत नाही. परीक्षेस नेमलेल्या ग्रंथातील गहन विषय सुलभ करून देणारी पुस्तके छापून काढल्याने कोठे बिघडते, 'आम्हास समजत नाही किंवा अवाढव्य विषयांस थोडक्यात वाचकांपुढे मांडणारे मार्गदर्शक छोटे किताब असल्याने कोणती हानी होते तीही आम्हास समजत नाही. कोणत्याही ग्रंथावर अर्थ स्पष्ट करणाऱ्या टीका तयार करणे किंवा तो विषय फार मोठा असल्यास विषयांत प्रवेश करू इच्छिणाऱ्या 'बालानां सुखबोधाय' लहानसा संग्रह तयार करणे, हा प्रघात फार पूर्वीपासूनचा आहे. थोरल्या 'कौमुदी'च्या पाठीवर 'लघुकौमुदी'चे धाकटे भावंड आहेच; न्यायाच्या मोठ्या ग्रंथाच्या आधाराने रचलेल्या तर्क-संग्रह, तर्ककौमुदी वगैरे वह्या आहेतच; मोठमोठ्या काव्यग्रंथावर मल्लीनाथादिकांच्या हजारो टीका आहेत. आमच्या इकडे जी स्थिती, तीच युरोपात आहे. अर्थ विशद करणाऱ्या टीकाही पाहिजेत व विषयाचे एकदम आकलन करण्यास उपयोगी पडणारे सारग्रंथही पाहिजेत. या नोटांस व 'एपिटोमांस इतका दोष देण्याचे कारण प्रिन्सिपलसाहेब असे सांगतात की, या नोटांनी घोकंपट्टीस अत्यंत उत्तेजन येते. हल्ली चोहोकडे छापील नोटा तयार आहेत. परीक्षक नेमलेल्या साहेबांच्या नोटा छापलेल्या नसल्यास हस्तलिखित प्रती मिळवण्याचा उद्योग सुरू आहे व ह्या सर्व नोटांची घोकंपट्टीही सुरू आहे. एवढ्या गोष्टी माधवरावजींप्रमाणे आम्हालाही कबूल आहेत; परंतु नोटा आहेत म्हणून मुले त्या घोकतात किंवा घोकंपट्टीची सवयच म्हणून विद्यार्थ्यांच्या लाडक्या सवयीला बहुमान देऊन नोटा तयार होतात, असल्या सिद्धान्तास आमच्याने संमती देववत नाही. प्रिन्सिपल- साहेबांनी कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या रीतीचे फार मार्मिकपणाने निरीक्षण केले आहे, हे त्यांच्या ग्रंथांवरून दिसते. मग बाकीच्या गोष्टींप्रमाणे याच बाबतीत उघड उघड वस्तुस्थिती लोकांपुढे मांडण्यात त्यांचे मन का कचरले, हे त्यांचे त्यांसच माहीत. नोटांची घोकंपट्टी जारीने सुरू असण्याचे कारण आमच्या मते असे आहे की, घोकलेल्या नोटांना अनुसरूनच बरेचसे प्रश्न येतील, अशी विद्यार्थ्यांची समजूत असते. मोठमोठ्या ऐतिहासिक ग्रंथांची चार-पाच हजार पाने मननपूर्वक वाचण्यापेक्षा व प्रोफेसरांच्या त्यावरील प्रगल्भ विचारांचा मनात ख करत बसण्यापेक्षा, आठ- दहा तावांची वही घोकल्याने साठ-सत्तर गुण मिळू शकतात, अशी परीक्षेत पास होण्याकरता हापापलेल्या विद्यार्थ्यांची समजूत झाल्यावर, नेमलेल्या ग्रंथावर योग्य परिश्रम करण्याइतकी त्यांची ज्ञानेच्छा प्रबल परिशिष्ट- ४१४१