________________
कीर्तनकारांच्या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक हे वीणा हाती घेऊन गात असत. गायनाचा महिमा समजणे निराळे व गाणे निराळे. हरिकथा ही गावयाची असते. मनात आनंदाच्या ऊर्मी उत्पन्न होतील, तेव्हाच आपण गातो. तो प्रहर्ष, तो अनुराग गायनात असल्याशिवाय गायन मधुर लागणार नाही. वेद-वाक्यसुद्धा नुसते म्हणण्यापेक्षा गायल्याने अधिक प्रिय वाटते. वेदांना 'सामवेदोऽस्मि' 'वेदांचा मी सामवेद आहे,' असे भगवंतांनी सांगितले आहे. या वाक्यावरील 'गीतारहस्यां'तील टीका आपण अवश्य वाचावी म्हणजे गायनाला प्राधान्य का आहे, हे समजेल. सुशिक्षितांबरोबर चालावे कसे, बोलावे कसे, हे रामदास स्वामींना विचारा. 'मुख्य हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण | सुशिक्षितांची ही दुसरी चाल ओळखली पाहिजे. या मुलांबरोबर आपण खेळले पाहिजे. अंगणात चाललेला हा खेळ सावलीत बसून पाहिला पाहिजे, नाही तर आपले पतन होईल. मुलांचे ऐकणे, त्यांचे विचार नापसंत असले तरी समजून घेणे, हे कार्य आपण केले पाहिजे. अंगणात खेळत असलेली सुशिक्षित मंडळी आपणाकडे पाहतील, असे वागा. या सर्व गोष्टी नीट लक्षात घेऊन आपण परमेश्वराचे अध्याहृत कार्य चालवले तर आपणास परमेश्वर खास यश देईल. आज आमच्या कोणी पाया पडतच नाही, अशी तुमची तक्रार आहे; पण याच पद्धतीने आपण सतत कार्य सुरू ठेवल्यास आपल्या पाया पडण्यास फार लोक येतात व त्यामुळे त्रास होतो अशी तक्रार करण्याची आपल्यावर पाळी येईल. 1 खाडिलकर - ५ परिशिष्ट - २ १२९